शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

पीक विमा योजनेचे निकष बदलले

By admin | Updated: June 6, 2014 01:00 IST

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़ आता खरीप हंगामातील पिकांनाही फळपिकांप्रमाणेच हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे़ पहिल्या टप्प्यात ही योजना १२ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, योजनेत सात पिकांचा समावेश करण्यात आला आहे़प्रत्येक महसूल विभागातील दोन जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांना हवामान आधारित पथदर्शी पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ याबाबत माहिती देताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यातील ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून या क्षेत्राच्या कृषी उत्पादनावर हवामान घटकांचा मोठा परिणाम होत आहे़ राज्यात यापूर्वी सर्वंकष पीक विमा योजना लागू होती़ या योजनेद्वारे पीक उत्पादनावर आधारित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जात होती़ मात्र, प्रतिकूल हवामानाने पीक उत्पादन घटल्यास त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नव्हता़ हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे शेतकर्‍यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते़ त्यामुळे खरीप हंगामातील पिकांनाही हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते़ याबाबतचा शासननिर्णय नुकताच लागू करण्यात आला आहे़ पहिल्या टप्प्यात विमा योजनेची अंमलबजावणी १२ जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले़या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत ३० जून असून या योजनेच्या माहितीसाठी शेतकर्‍यांनी स्थानिक कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

राज्यातील ठाणे, रायगड, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातुर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा या बारा जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे़भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे़ अपुरा आणि अती!अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन घटकांच्या धोक्यापासून शेतपिकांना या योजनेअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे़ ४स्वयंचलीत हवामान केंद्राव्दारे हवामानातील बदलाची नोंद करण्यात येणार आहे़