शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

पीक विमा योजनेचे निकष बदलले

By admin | Updated: June 6, 2014 01:00 IST

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़ आता खरीप हंगामातील पिकांनाही फळपिकांप्रमाणेच हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे़ पहिल्या टप्प्यात ही योजना १२ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, योजनेत सात पिकांचा समावेश करण्यात आला आहे़प्रत्येक महसूल विभागातील दोन जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांना हवामान आधारित पथदर्शी पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ याबाबत माहिती देताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यातील ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून या क्षेत्राच्या कृषी उत्पादनावर हवामान घटकांचा मोठा परिणाम होत आहे़ राज्यात यापूर्वी सर्वंकष पीक विमा योजना लागू होती़ या योजनेद्वारे पीक उत्पादनावर आधारित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जात होती़ मात्र, प्रतिकूल हवामानाने पीक उत्पादन घटल्यास त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नव्हता़ हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे शेतकर्‍यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते़ त्यामुळे खरीप हंगामातील पिकांनाही हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते़ याबाबतचा शासननिर्णय नुकताच लागू करण्यात आला आहे़ पहिल्या टप्प्यात विमा योजनेची अंमलबजावणी १२ जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले़या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत ३० जून असून या योजनेच्या माहितीसाठी शेतकर्‍यांनी स्थानिक कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

राज्यातील ठाणे, रायगड, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातुर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा या बारा जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे़भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे़ अपुरा आणि अती!अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन घटकांच्या धोक्यापासून शेतपिकांना या योजनेअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे़ ४स्वयंचलीत हवामान केंद्राव्दारे हवामानातील बदलाची नोंद करण्यात येणार आहे़