शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

हिवरेबाजारच्या पुढाकारातून २८ हजार गावात कोरोनामुक्त गाव अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

अहमदनगर : राज्यातील २८ हजार गावे कोरोनामुक्त करण्यासाठी आदर्श गाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यासाठी आता ...

अहमदनगर : राज्यातील २८ हजार गावे कोरोनामुक्त करण्यासाठी आदर्श गाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यासाठी आता गावपातळीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य व ग्रामविकास मंत्र्यांना गुरुवारी पाठविला आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हिवरेबाजारने कोरोनामुक्त गाव अभियान सुरू करून गाव कोरोनामुक्त केले. त्यासाठी गावात विविध समित्या व त्यांचे कामकाज यांची काटेकोर कार्यवाही सुरू केली. आता याच धर्तीवर राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांमध्ये कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जशा स्पर्धा घेण्यात आल्या तशाच प्रकारच्या स्पर्धा कोरोनामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून आता राबविण्यात येणार आहे. या स्पर्धांचा आराखडा पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून गावांची यासाठी पूर्वतयारी करून घेण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

---

असा आहे स्पर्धेचा आराखडा

ही स्पर्धा ५o गुणांची असणार आहे. त्यात २१ मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार गुणांकन केले जाणार आहे.

गावात कोरोनामुक्तीसाठी मुख्य समिती निश्चित करणे, गावातील सहकारी संस्था व तत्सम संस्थांचा सहभाग घेणे प्रत्येकी ५ गुण, जनजागृतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, लसीकरण करणे या मुद्यांना प्रत्येकी तीन गुण, विविध पथकांची निर्मिती करणे, सर्व कुटुंबांचा सर्व्हे, ट्रेसिंग करणे, रॅपिड टेस्टची व्यवस्था, संशयितांना विलगीकरणात ठेवणे, बाधितांना उपचारासाठी पाठविणे, त्यासाठी वाहतुकीची व्यवस्था, विलगीकरण कक्षात सर्व साहित्य ठेवणे, गावातील खासगी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे, कुटुंबातील सर्व सदस्य बाधित असतील तर पथकाने सहकार्य करणे, बाधित कुटुंबातील शेतकऱ्यांचे दूध, भाजीपाला स्वयंसेवकांमार्फत योग्य ठिकाणी पोहोचविणे, बाधितांचे मनोबल वाढविण्यासाठी समितीने त्यांच्याशी संवाद करणे, कोरोनाविरहित कुटुंबाची विशेष नोंद ठेवणे, लक्षणे असणाऱ्यांना उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था, लहान मुले, गर्भवती मातांचा सर्व्हे, चाकरमान्यांसाठी घेतलेली खबरदारी, मृत्युदर कमी असणे, पथकातील कोणीच बाधित होऊ नये म्हणून नियमांचे पालन या मुद्यांना प्रत्येकी २ गुण असतील.

---

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तरीही सर्व गावे त्याचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असावेत, यासाठी कोरोनामुक्त गाव अभियानाची संकल्पना तयार करण्यात आली. गावांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचा आराखडा गुरुवारी राज्य सरकारला पाठविला आहे.

- पद्मश्री पोपटराव पवार,

हिवरे बाजार