शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

हिवरेबाजारच्या पुढाकारातून २८ हजार गावात कोरोनामुक्त गाव अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

अहमदनगर : राज्यातील २८ हजार गावे कोरोनामुक्त करण्यासाठी आदर्श गाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यासाठी आता ...

अहमदनगर : राज्यातील २८ हजार गावे कोरोनामुक्त करण्यासाठी आदर्श गाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यासाठी आता गावपातळीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य व ग्रामविकास मंत्र्यांना गुरुवारी पाठविला आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हिवरेबाजारने कोरोनामुक्त गाव अभियान सुरू करून गाव कोरोनामुक्त केले. त्यासाठी गावात विविध समित्या व त्यांचे कामकाज यांची काटेकोर कार्यवाही सुरू केली. आता याच धर्तीवर राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांमध्ये कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जशा स्पर्धा घेण्यात आल्या तशाच प्रकारच्या स्पर्धा कोरोनामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून आता राबविण्यात येणार आहे. या स्पर्धांचा आराखडा पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून गावांची यासाठी पूर्वतयारी करून घेण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

---

असा आहे स्पर्धेचा आराखडा

ही स्पर्धा ५o गुणांची असणार आहे. त्यात २१ मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार गुणांकन केले जाणार आहे.

गावात कोरोनामुक्तीसाठी मुख्य समिती निश्चित करणे, गावातील सहकारी संस्था व तत्सम संस्थांचा सहभाग घेणे प्रत्येकी ५ गुण, जनजागृतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, लसीकरण करणे या मुद्यांना प्रत्येकी तीन गुण, विविध पथकांची निर्मिती करणे, सर्व कुटुंबांचा सर्व्हे, ट्रेसिंग करणे, रॅपिड टेस्टची व्यवस्था, संशयितांना विलगीकरणात ठेवणे, बाधितांना उपचारासाठी पाठविणे, त्यासाठी वाहतुकीची व्यवस्था, विलगीकरण कक्षात सर्व साहित्य ठेवणे, गावातील खासगी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे, कुटुंबातील सर्व सदस्य बाधित असतील तर पथकाने सहकार्य करणे, बाधित कुटुंबातील शेतकऱ्यांचे दूध, भाजीपाला स्वयंसेवकांमार्फत योग्य ठिकाणी पोहोचविणे, बाधितांचे मनोबल वाढविण्यासाठी समितीने त्यांच्याशी संवाद करणे, कोरोनाविरहित कुटुंबाची विशेष नोंद ठेवणे, लक्षणे असणाऱ्यांना उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था, लहान मुले, गर्भवती मातांचा सर्व्हे, चाकरमान्यांसाठी घेतलेली खबरदारी, मृत्युदर कमी असणे, पथकातील कोणीच बाधित होऊ नये म्हणून नियमांचे पालन या मुद्यांना प्रत्येकी २ गुण असतील.

---

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तरीही सर्व गावे त्याचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असावेत, यासाठी कोरोनामुक्त गाव अभियानाची संकल्पना तयार करण्यात आली. गावांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचा आराखडा गुरुवारी राज्य सरकारला पाठविला आहे.

- पद्मश्री पोपटराव पवार,

हिवरे बाजार