शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

कोरोनामुळे यंदा बदल्यांबाबत साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत आणि तालुक्यांतर्गत बदल्याची प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात होते. यंदा कोरोना संसर्गाचा कहर असल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत आणि तालुक्यांतर्गत बदल्याची प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात होते. यंदा कोरोना संसर्गाचा कहर असल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आवश्यक असणारी माहिती तयार करून ठेवली असून, शासनाने आदेश दिल्यास बदल्या करण्यात येणार आहेत.

दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १५ मेपर्यंत राबवते. जिल्ह्यांतर्गत आणि तालुक्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी ग्रामविकास विभाग शासन आदेश काढून बदल्यांचा रेशो निश्‍चित करून देतात. साधारणपणे दरवर्षी एकूण कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार १० टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या होतात. यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ती प्रसिद्ध करत असते. यंदाही ती करण्यात आली आहे. बदल्यांबाबत शासनाचा आदेश आला तर बदल्या होतील; अन्यथा आहे ती स्थिती राहील, अशी शक्यता आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे बदल्या करण्यात येऊ नयेत, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. आधीच वाढत्या कोरोना संकटामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आहे. शासनाने या महामारीत १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावलेले आहे. यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना बदलीत सूट द्यावी आणि ते शक्य नसल्यास प्रशासकीय बदल्या रद्द करून केवळ विनंती बदली करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.