कोपरगाव : वृक्षारोपण काळाची गरज आहे, असे आपण अनेक वर्षांपासून ऐकत होतो. परंतु, कोरोनामुळे त्याचे महत्त्व आपणाला कळले आहे. या काळात लाखो रुपये खर्च करून ऑक्सिजन विकत घ्यावा लागला. ही वेळ आलेली आहे. आता प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्याची गरज आहे. कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेत वृक्षारोपण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी व्यक्त केले.
कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून गोदावरी नदीपात्रासह परिसरात सोमवारी (दि. १२) सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर, सिनेअभिनेत्री मयूरी कापडणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणासाठी नाशिक येथील व्यावसायिक विपुल मेहता, शिर्डी येथील रवींद्र जेजुरीकर, पत्रकार युसूफ रंगरेज व आनंद काले यांनी वड, पिंपळ, कडुलिंब व चिंच, जांभूळ ही ६६ झाडे मोफत उपलब्ध करून दिली.
या कार्यक्रमासाठी कुंभारी आश्रमाचे महंत राघवेश्वर गिरी महाराज, सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर, सिनेअभिनेत्री मयूरी कापडणे, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, विश्वस्त संदीप रोहमारे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, प्राचार्य बी.एस. यादव, राजेश पंडित, सचिन तांबे, लक्ष्मण सावजी, मुख्याध्यापिका मंजूषा सुरवसे, वानप्रस्थ फाउंडेशनचे सर्व सदस्य, महारुद्र गालट, नारायण अग्रवाल, निलेश धुमाळ, मनोज कपोते, बालाजी गोर्डे, अतिश शिंदे, ईश्वर साटोटे, प्रा. रवींद्र जाधव, प्रा. संजय अरगडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय सांगळे, मंगेश गुंजाळ, भाऊसाहेब आव्हाड, सौरभ मुंगसे, निलेश पाटील, हेमंत लव्हाटे, प्रसाद चौधरी, प्रज्वल ढाकणे, वैभव आगळे, रवी जन्नवार, प्रदीप गुरली, वैष्णवी ढाकणे यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश बनसोडे यांनी, तर उपस्थितांचे बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो१४ - वृक्षारोपण - कोपरगाव