शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना साथीचे लोण शहरांतून ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST

श्रीरामपूर : जिल्ह्यात प्रारंभी शहरांमध्ये आलेल्या कोरोना प्रादुर्भावाचे लोण आता ग्रामीण भागाकडे सरकल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील रुग्णसंख्या दुसऱ्या ...

श्रीरामपूर : जिल्ह्यात प्रारंभी शहरांमध्ये आलेल्या कोरोना प्रादुर्भावाचे लोण आता ग्रामीण भागाकडे सरकल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेतील उच्चांकाच्या तुलनेत निम्म्यावर घटली आहे. ग्रामीण भागामध्ये मात्र तब्बल तीन पट रुग्ण आढळून येत आहेत.

प्रारंभी नगर शहर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर ही मोठी शहरे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. महापालिका तसेच ब वर्ग नगरपालिका असलेल्या मोठ्या शहरांतून आता व्हायरसने छोट्या शहरात व ग्रामीण भागात शिरकाव केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा, पारनेर या तालुक्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे.

नगर महापालिकेच्या हद्दीपेक्षा नगर तालुक्यात दुप्पट तर संगमनेर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये चक्क दहा पटीने अधिक सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर व कोपरगावमध्ये अशीच स्थिती असून तेथेही शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आलेला आहे.

-----

रुग्णालयातील बेड्स खाली

पंधरा दिवसांपूर्वी शहरातील सर्वच रुग्णालयांत बेड्स फुल होते. विशेषतः ऑक्सिजन बेड्स तर उपलब्ध करणे अशक्यप्राय गोष्ट बनली होती. आता मात्र जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये रुग्णांना सहजासहजी ऑक्सिजन बेड्स मिळत आहेत.

----

मोठ्या शहरातील सक्रिय रुग्ण

नगर महापालिका : ७८७

संगमनेर शहर : २४९

श्रीरामपूर शहर : ३५५

कोपरगाव : शहर व तालुका ७९९

------

ग्रामीण भागातील सक्रिय रुग्ण

संगमनेर तालुका : २१००

नगर तालुका : १६२२

नेवासा : १४३९

शेवगाव : १३४१

अकोले : १४३४

पाथर्डी : १३७८

पारनेर : १२६९

श्रीगोंदा : १००१

श्रीरामपूर : ९६६

------

ग्रामीण भागात प्रसारामागील कारणे

ग्रामीण भागामध्ये शहरांच्या तुलनेत मास्क, सॅनिटायझर वापराचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरामध्ये बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकरी वर्गाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पैशांअभावी रुग्णालयात उपचाराचा खर्च परवडत नाही. त्यामुळे लोक नाइलाजाने घरातच उपचार घेत आहेत. त्याच्या परिणामी संपूर्ण कुटुंबे बाधित होत आहेत.

-----

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर चाचण्या

जिल्हा प्रशासनाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आता संशयित रुग्णांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. यामध्ये रॅपिड चाचणी तसेच आरटीपीसीआर या दोन्हीही चाचण्यांचे प्रमाण सारखे आहे. अनेक गावांमध्ये तर कॅम्प घेऊन चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्ण संख्या अचानक वाढल्याचे दिसते.

-----

संगमनेर शहरात पंधरा दिवसांपूर्वी दररोज दीडशेहून अधिक रुग्ण मिळत होते. परिस्थिती चिंताजनक होती. आता मात्र, दररोज केवळ २० ते २५ रुग्ण मिळून येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात घेतल्या गेलेल्या शंभर चाचण्यांमध्ये केवळ एक किंवा दोन रुग्ण पॉझिटिव्ह मिळत आहेत. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे.

-सचिन बांगर,

मुख्याधिकारी, संगमनेर पालिका

----