शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

कोरोनामुळे समाजकल्याणचे वाचले सव्वाबारा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

अहमदनगर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची सर्व १०३ वसतिगृहे बंद असल्याने त्यात असलेले सुमारे साडेचार ...

अहमदनगर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची सर्व १०३ वसतिगृहे बंद असल्याने त्यात असलेले सुमारे साडेचार हजार विद्यार्थी आपापल्या घरी गेली आहेत. परिणामी समाजकल्याण विभागाकडून दर महिन्याला संस्थांना दिले जाणारे प्रतिविद्यार्थी परिपोषण अनुदानाचे १,५०० रुपयांप्रमाणे गेल्या दीड वर्षांत १२ कोटी २७ लाख ९६ हजार रूपये वाचले आहेत.

कोरोनामुळे मार्च २०२०पासून सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाची वसतिगृहे बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यात १०३ वसतिगृहे चालविली जातात. म्हणजे शैक्षणिक संस्थांच्या जागेवर ही वसतिगृहे आहेत. समाजकल्याण विभाग तेथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी प्रतिमहिना १५०० रुपये परिपोषण अनुदानापोटी देतो. तसेच वसतिगृहावर असलेल्या अधीक्षकांना ९ हजार २०० रुपये, स्वयंपाकीस ६ हजार ९००, मदतनिसास ५ हजार ७५०, तर चौकीदारास ५ हजार ७५० रुपये अनुदान प्रतिमहा दिले जाते. वसतिगृहे बंद असली तर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित दिले जात आहे. केवळ विद्यार्थी वसतिगृहात नसल्याने त्यांचे पोषण अनुदान संस्थांना दिले जात नाही. जिल्ह्यात समाजकल्याणच्या १०३ वसतिगृहांतील विद्यार्थीसंख्या ४ हजार ५४८ एवढी आहे. त्यापोटी दिले जाणारे दीड वर्षाचे १२ कोटी २७ लाख ९६ हजार रुपये अनुदान शासनाचे वाचले आहे.

--------------

वसतिगृहे बंद, कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू

जिल्ह्यातील १०३ वसतिगृहांवर १०३ अधीक्षक (वेतन ९,२००), १३२ स्वयंपाकी (वेतन ६,९००), २९ मदतनीस (वेतन ५,७५०, तर १०३ चौकीदार (वेतन ५,७५०) कार्यरत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून वसतिगृहे बंद असली तरी या कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले जात आहे. गेल्या दीड वर्षांत या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी समाजकल्याणने ४ कोटी ७१ लाख रुपये एवढ्या रकमेची तरतूद केली आहे.