शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शेतकऱ्यांचा माल घरातच पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:34 IST

केडगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्केटमध्ये वेळेची मर्यादा, शेतकऱ्यांची संभ्रमावस्था आणि लॉकडाऊन यामुळे नगर बाजार समितीत गेल्या काही ...

केडगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्केटमध्ये वेळेची मर्यादा, शेतकऱ्यांची संभ्रमावस्था आणि लॉकडाऊन यामुळे नगर बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून धान्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. दरही घसरले आहेत. सध्या चिंच वगळता इतर अन्नधान्याचे मार्केट बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल घरीच पडून आहे.

मे महिन्याच्या अखेरीस खरीप हंगामाची लगबग सुरू होते. शेतीची मशागत करण्याच्या कामाला वेग येतो. रबी हंगाम संपून महिना लोटला. मागील मोसमात पाऊस जास्त झाल्याने यंदा रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा यांचे समाधानकारक उत्पादन निघाले. नगर तालुक्यात ज्वारीचे ७०० मेट्रिक टन उत्पादन मिळाले तर गव्हाचे २६३ मेट्रिक टन उत्पादन मिळाले. मात्र, हंगाम संपताच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम नगर बाजार समितीमधील धान्याच्या व्यापारावर झाला. त्यात मार्केट सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना या वेळेत आपले धान्य विक्रीसाठी आणणे शक्य होत नाही. याचा परिणाम धान्याची आवक मंदावली आहे. तसेच भावातही काहीशी घसरण झाली आहे. आता १० मेपर्यंत चिंच वगळता इतर मार्केट बंद झाले आहेत.

...................

धान्याची आवक व दर

ज्वारी गावरान = ५ क्विंटल दर - ३२५०

हरभरा = २० क्विंटल

दर- ४८००

गहू = ३० क्विंटल

दर- १७२५

चिंच = ३४५ क्विंटल दर - ७०००

............

यंदा पाऊस वेळेवर पडल्यामुळे गव्हाचे पीक चांगले आले. मात्र, यावर्षी गव्हाला अवघा १६०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. बाजार वाढेल या आशेने गहू ठेवला; परंतु लॉकडाऊनमुळे आता मार्केट बंद आहे. त्यामुळे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

-शरद रावसाहेब निमसे, शेतकरी, साकतखुर्द

..............

सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे.

लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. गावरान कांदा शेतात पडून आहे. गहू तयार झाला आहे; परंतु मार्केट बंद असल्याने विक्रीसाठी पाठवता येत नाही. उन्हाळ्यात टँकरने पाणी टाकून लिंबाची बाग जगविली; परंतु लिंबू विक्रीसाठी बाजारपेठ सुरू नसल्याने बागेतच लिंबू सडत आहेत. त्यामुळे जगावे तरी कसे, असा प्रश्न पडला आहे.

-बाळासाहेब सोपान तवले, शेतकरी, जेऊर

.............

सध्या धान्याचे मार्केट बंद आहे. आवक अतिशय कमी होती. सध्या फक्त चिंचाचे मार्केट सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याने शेतकरी धान्य आणत नाहीत. दरही स्थिर आहेत.

-विजय कोथंबिरे, व्यापारी

..............................

कोरोनामुळे मार्केटमध्ये वेळेची मर्यादा होती. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल मार्केटमध्ये आणणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला. शेतकरीही माल मार्केटमध्ये आणण्यास घाबरत आहेत. आता लॉकडाऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरच धान्याचे मार्केट सुरळीत होईल.

-शिवाजी आंबेकर, व्यापारी