शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

अपघातग्रस्त राहुलचा जीवनाशी संघर्ष

By admin | Updated: April 1, 2016 00:51 IST

रियाज सय्यद, संगमनेर दैव देते पण, नशीब नेते, ही म्हण दुर्दैवाने कासारवाडीतील वडार समाजातील गरीब युवकाच्या बाबतीत खरी ठरत आहे.

कोलकाता : उत्तर कोलकाताच्या वर्दळीच्या मुख्य मार्गावर दोन कि.मी. लांब निर्माणाधीन फ्लायओव्हर कोसळून त्याखाली किमान १८ जण ठार तर सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. अनेक वाहने, फेरीवाले आणि पादचारी ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. गुरुवारी दुपारी कोलकात्यातील सर्वात मोठा घाऊक बाजार असलेल्या बडाबाजारजवळील टागोर मार्गावर ही घटना घडली आणि शहरात हाहाकार उडाला. अतिशय दाट वस्ती असलेला हा भाग आहे.जखमींना लगतच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. पुलाचा काही भाग कोसळत असताना अनेक लोक, कार, आॅटोरिक्षा आणि हॉकर्स मलब्याखाली दबत असल्याचे तर काही जण पळून जात असताना अचानक त्यात अडकल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. अनेकांनी आरडाओरड करीत सुरक्षित स्थळी धाव घेतली तर काही लोक ढिगाऱ्याखाली दबून रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करीत असल्याचे आणि मदतीसाठी धावून जाणारे त्यांना पाण्याच्या बाटल्या पुरवित असल्याचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. (वृत्तसंस्था)राव म्हणतात, देवाने केलेले कृत्य... हे दुसरे काही नसून देवाने केलेले कृत्य आहे, असा दावा हैदराबादच्या आयव्हीआरसीएल बांधकाम कंपनीचे पांडुरंग राव यांनी केल्यामुळे चौफेर टीका होऊ लागली आहे. यापूर्वीच्या डाव्या आघाडीच्या सरकारने २००९ मध्ये संबंधित निविदा मंजूर केल्या होत्या. अनेकदा स्मरणपत्रे पाठवूनही हैदराबादच्या उपरोक्त कंपनीने सरकारला बांधकामासंबंधी विस्तृत आराखडा दिलेला नव्हता, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. प. मिदनापूर जिल्ह्णातील निवडणूक प्रचार अर्धवट सोडून त्या कोलकात्यात परतल्या.पाच लाखांची मदत...राज्य सरकार मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींना तीन लाख रुपयांची मदत देण्यासह जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करणार आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांच्या मदतीसाठी पथक पाठविण्याचे आदेश गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिले.