शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बिले थकल्याने कंत्राटदारांचा आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST

अहमदनगर : गेल्या पाच वर्षांपासून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत केलेल्या कामाची (२५१५) बिले थकली असून, ती तातडीने अदा करावीत, ...

अहमदनगर : गेल्या पाच वर्षांपासून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत केलेल्या कामाची (२५१५) बिले थकली असून, ती तातडीने अदा करावीत, अन्यथा कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येईल, असा इशारा राज्य कंत्राटदार महासंघाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागात दिलेल्या निवेदनात दिला आहे.

रोजगार हमी योजनेच्या (कार्य) कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, जिल्ह्यात २०१५ ते २०२० या वर्षांत २५१५ची अनेक कामे झाली. या कामांसाठी नियुक्त कंत्राटदारांनी बँकांचे कर्ज काढून या योजनेतील कामे पूर्ण केली. ही सर्व कामे पूर्ण होऊन एक ते दोन वर्षे झाली तरी या कामाचे पैसे शासनाकडून मिळालेले नाहीत. गेल्या ५ वर्षांत सुमारे ३४ कोटी रुपयांची थकीत बिलाची रक्कम असून, ती तातडीने अदा करावी. अनेक कंत्राटदार बिले मिळत नसल्याने मानसिक तणावाखाली आहेत. त्वरित ही बिले अदा केली नाही, तर कंत्राटदार आत्महत्या करतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची असेल, असा इशारा राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. समीर शेख, उपाध्यक्ष हर्षद भोर्डे, सचिव मिलिंद बोंगाने, खजिनदार अक्षय कराड, संघटक हृषीकेश ढाकणे, शहराध्यक्ष वैष्णव मिसाळ आदींनी दिला आहे.