अकोले : निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. १ हजार ७०० क्युसेक वेगाने हे पाणी नदीपात्रात झेपावले. बुधवारी सायंकाळी कळस बुद्रूक शिवार ओलांडत संगमनेर तालुक्याच्या हद्दीत आवर्तनाच्या पाण्याने प्रवेश केला. अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्यातील नदीकाठावरील गावांच्या मंजूर पाणी पुरवठा योजना, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आकस्मित पाणी पुरवठा योजना व गावतळ्यांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. आवर्तन काळात ७०० ते ८०० दलघफू इतके पाणी वापरात येणार आहे. निळवंडे ते नेवासा नदीकाठ व कालव्यांच्या कडेच्या भागात २१ तास वीज पुरवठा खंडित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
निळवंडेचे पिण्याचे आवर्तन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 00:03 IST