शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड-शिर्डी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

By admin | Updated: February 17, 2024 15:51 IST

भाऊसाहेब येवले, राहुरी मनमाड-शिर्डी या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दिल्ली येथील रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेतली.

 भाऊसाहेब येवले, राहुरी मनमाड-शिर्डी या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दिल्ली येथील रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेतली. साधारण चार महिन्यांत या मार्गावर विद्युत रेल्वे धावण्याची शक्यता आहे. शिवाय या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तसे झाल्यास शिर्डीसाठी देशभरातून रेल्वेगाड्या वाढणार असून, भक्तांचा ओघही आपोआपच वाढेल. शिर्डी या धार्मिकस्थळाचे महत्व आता जगभर पसरले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथ ेहजेरी लावत असतात. भाविकांची ही वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने गाड्या वाढविण्याचे नियोजन केले आहे़ शिवाय या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी येत्या बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे़ शिर्डीसाठी चाळीस रेल्वे गाड्यांची प्रस्तावात तरतूद आहे़ त्यामुळे भविष्यकाळात रेल्वेने येणार्‍या भाविकांत भर पडणार आहे. शिवाय शनिशिंगणापूर येथेही भक्तांची वर्दळ वाढेल. मनमाड ते शिर्डी या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेण्यात आली़ दिल्ली येथून आलेल्या रेल्वेच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी चाचणी घेऊन या मार्गाची पाहणी केली. कामात काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला कळले जाईल, अन्यथा विद्युत रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे सुरक्षा विभागाच्या परवानगीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे हालचाली मंदावल्या होत्या़ आता नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रक्रियेला गती येणार आहे. दुसर्‍या टप्प्याचे ८० टक्के काम दुसर्‍या टप्प्यातील दौंड ते पुणे या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचेही ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामार्गावर ९ ते १० रोहित्र असणार आहेत़ हे कामही अंतिम टप्प्यात असून साधारण वर्षभरात या मार्गाची चाचणी घेण्यात येईल. त्यामुळे पुणे-मनमाड या मार्गाने जाणार्‍या रेल्वे गाड्यांना गती येईल. शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने ते एक महत्वाचे पाऊल ठरेल, असे जिल्हा प्रवाशी संघटनेच्या अध्यक्षा सुचेता कुलकर्णी यांनी सांगितले़