शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मनमाड-शिर्डी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

By admin | Updated: February 17, 2024 15:51 IST

भाऊसाहेब येवले, राहुरी मनमाड-शिर्डी या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दिल्ली येथील रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेतली.

 भाऊसाहेब येवले, राहुरी मनमाड-शिर्डी या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दिल्ली येथील रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेतली. साधारण चार महिन्यांत या मार्गावर विद्युत रेल्वे धावण्याची शक्यता आहे. शिवाय या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तसे झाल्यास शिर्डीसाठी देशभरातून रेल्वेगाड्या वाढणार असून, भक्तांचा ओघही आपोआपच वाढेल. शिर्डी या धार्मिकस्थळाचे महत्व आता जगभर पसरले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथ ेहजेरी लावत असतात. भाविकांची ही वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने गाड्या वाढविण्याचे नियोजन केले आहे़ शिवाय या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी येत्या बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे़ शिर्डीसाठी चाळीस रेल्वे गाड्यांची प्रस्तावात तरतूद आहे़ त्यामुळे भविष्यकाळात रेल्वेने येणार्‍या भाविकांत भर पडणार आहे. शिवाय शनिशिंगणापूर येथेही भक्तांची वर्दळ वाढेल. मनमाड ते शिर्डी या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर नुकतीच विद्युत रेल्वेची चाचणी घेण्यात आली़ दिल्ली येथून आलेल्या रेल्वेच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी चाचणी घेऊन या मार्गाची पाहणी केली. कामात काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला कळले जाईल, अन्यथा विद्युत रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे सुरक्षा विभागाच्या परवानगीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे हालचाली मंदावल्या होत्या़ आता नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रक्रियेला गती येणार आहे. दुसर्‍या टप्प्याचे ८० टक्के काम दुसर्‍या टप्प्यातील दौंड ते पुणे या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचेही ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामार्गावर ९ ते १० रोहित्र असणार आहेत़ हे कामही अंतिम टप्प्यात असून साधारण वर्षभरात या मार्गाची चाचणी घेण्यात येईल. त्यामुळे पुणे-मनमाड या मार्गाने जाणार्‍या रेल्वे गाड्यांना गती येईल. शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने ते एक महत्वाचे पाऊल ठरेल, असे जिल्हा प्रवाशी संघटनेच्या अध्यक्षा सुचेता कुलकर्णी यांनी सांगितले़