शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मिरी-तिसगाव-करंजी पाणी योजनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

करंजी : सतत दुष्काळी व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३२ गावांची तहान भागविणाऱ्या मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक ...

करंजी : सतत दुष्काळी व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३२ गावांची तहान भागविणाऱ्या मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांबाबत गंभीर तक्रारी करण्यात आला आहेत. याची दखल घेत याबाबत शनिवारी बैठक घेणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भागात नेहमीच कमी पाऊस पडतो. उन्हाळ्यात या भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. त्यामुळे या भागातील ३२ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केली. ही योजना जिल्हा परिषदेने न चालविता पाणीपुरवठा संस्थेसकडे चालविण्यासाठी देण्यात आली. या संस्थेवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांपासून या पाणी योजनेचे अध्यक्ष म्हणून एकनाथ आटकर काम पाहात आहेत. या पाणी योजनेच्या कारभारावर आक्षेप घेत अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. या पाणी योजनेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्याची उचलबांगडी करून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करावी तसेच पाणी योजनेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील कार्यकर्त्यांनी केली. तनपुरे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन येत्या शनिवारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले. यावेळी माजी सभापती संभाजीराव पालवे, अमोल वाघ, शिराळचे सरपंच पिनू मुळे, अशोक टेमकर, जालिंदर वामन, तुळशीराम शिंदे, संतोष गरुड आदी उपस्थित होते.