शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

दिलासा... कोरोनाबाधितांचा ग्राफ डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’चे कठोर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे कोरोनाची साखळी खंडित ...

अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’चे कठोर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे कोरोनाची साखळी खंडित होण्यास बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे. मागील दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. महापालिकेने लागू केलेल्या निर्बंधांमुळे नगर शहरातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाल्याचे यावरून स्पष्ट होते.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास, चार दिवसात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पार गेलेला दिसतो. परंतु, हे चार दिवस वगळता रुग्णसंख्या तीन हजारांच्या दरम्यान आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक ४ हजार ६९४ वर पोहोचली होती. मात्र शनिवारी हा आकडा खाली आला. शनिवारी ३ हजार ६१३ नव्या रुग्णांची नोंद झाली. रविवारी त्यात आणखी घट होऊन नव्या ३ हजार ३२८ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, सोमवारी रुग्णांचा आकडा वाढून चार हजारपार गेला. मंगळवारी रुग्णसंख्येत घट झाली. बुधवारी हा आकडा तीन हजारांच्या खाली गेला असून, जिल्ह्यात २ हजार ७११ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कठोर निर्बंधामुळे रुग्णसंख्येत घसरण होत असल्याने कठोर निर्बंधांची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसात रुग्णसंख्या कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणेला आहे.

कोरोनाने ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. गावांसह वाड्या-वस्त्यांवरही कोरोना पोहोचला आहे. मागील एप्रिल महिन्यात नगर शहरात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत होती. परंतु, महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले. वैद्यकीय सेवा वगळता इतर दुकाने, भाजी बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, किराणा दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यास नगर शहरात प्रतिसाद मिळत असून, त्याचा परिणामही आता दिसू लागला आहे. ग्रामीण भागात मात्र अपेक्षेप्रमाणे रुग्णसंखेत घट होताना दिसत नाही. जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर आणि राहाता तालुक्यात दररोज दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. तसेच श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात शंभरहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नेवासा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्यात सर्वात कमी रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील पाच तालुके कोरोनाचा हॉट स्पॉट बनले असून, या तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

....

बरे झालेले रुग्ण

१,८७, १०७

...

सक्रिय रुग्ण

२७,०८६

.....

मृत्यूसंख्या

२,३६५

....

अशी घटली जिल्ह्यातील रुग्णसंख्या...

१-५ - ४२१९

२-५- ३८२२

३-५- २१२३

४-५- ३९६३

५-५- ४४७५

६-५- ४१३९

७-५- ४५९४

८-५- ३६१३

९-५- ३३२८

१०-५- ४०५९

११-५- ३१८४

१२-५- २७११

....

नगरमधील रुग्णसंख्या निम्म्याने घटली

नगर शहरात मागील आठवड्यात पाचशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत होती. परंतु, सोमवारपासून नगर शहरातील रुग्णसंखेत घट झाली आहे. मंगळवारी १९५, तर बुधवारी २५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने कठोर निर्बंधांची मुदत १५ मेपर्यंत वाढविली असून, पुढील तीन दिवसात किती रुग्ण आढळतात, यावरच पुढील निर्बंध वाढविण्याचा निर्णय अवलंबून आहे.