शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

लिपिक, स्वीय सहायक वर्षानुवर्षे एकाच टेबलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

अहमदनगर : महापालिकेतील वरिष्ठ लिपिकांसह स्वीय सहायक पदावर तेच ते कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे बदल्या होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे हितसबंध ...

अहमदनगर : महापालिकेतील वरिष्ठ लिपिकांसह स्वीय सहायक पदावर तेच ते कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे बदल्या होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे हितसबंध तयार झाले आहेत. अन्य विभागात बदली केल्यास हे कर्मचारी आपले वजन वापरून पुन्हा त्याच टेबलावर हजर होतात. त्यामुळे त्यांची महापालिकेत एक प्रकारे एकाधिकारशाही निर्माण झाली आहे.

महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या होत नाहीत. त्यामुळे तेच ते अधिकारी एका पदावर कार्यरत आहेत. विभागप्रमुख जसे बदलत नाहीत, तसे वरिष्ठ लिपिक व स्वीय सहायकही बदलले गेले नाहीत. वर्षानुवर्षे एका टेबलावर काम केल्याने त्यांचे ठेकेदार, पदाधिकारी, नगरसेवकांशी हितसंबंध तयार झाले आहेत. एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली केल्यास कामकाज ठप्प होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. वरिष्ठांनाही नवीन कर्मचारी नको असतात. त्यामुळे तेही बदली झाली तरी कर्मचाऱ्यांना सोडत नाहीत. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास काम थांबू नये, यासाठी पर्यायी कर्मचारी तयार ठेवणे, ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी सरकारने दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम केला आहे. कर्मचाऱ्यांच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली केल्यास पर्यायी कर्मचारी तयार होतील; पण बदलीचा निर्णय घेणार कोण, असाही प्रश्न आहे. कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलावर काम करत असल्याने प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच आहे. यावर कुणी आवाज उठवीत नाही. प्रशासकीय कामकाजाबाबत पदाधिकारी व नगरसेवकांकडून सभागृहात नाराजी व्यक्त केली जाते; परंतु कामात सुसूत्रता आणण्यासाठी ठोस निर्णय होत नाही. या उलट केलेली बदली रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले जाते.

.....

वसुलीचा बट्ट्याबोळ

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची पदाधिकारी व नगरसेवकांची मागणी आहे; परंतु वसुली होत नाही. प्रभाग कार्यालयनिहाय वसुली लिपिकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याने त्यांचे हितसंबंध तयार झालेले आहेत. त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. प्रभागांतर्गत त्यांच्या बदल्या करणे शक्य आहे; परंतु त्याही केल्या जात नाहीत. त्याचा परिणाम करवसुलीवर झाला आहे.