शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम, अभ्यासाचाच पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

----------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ...

-----------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु, पहिली ते चौथीच्या मुलांना बळजबरीने मोबाईलसमोर बसावे लागते. उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे चिमुकल्यांची धमाल सुरू असून, त्यांना साधी अक्षर ओळखही झालेली नाही. त्यांना आता अभ्यासाचाच विसर पडला असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. असे असले तरी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरविणे अशक्य आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका मुलांना आहे, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चिमुकल्यांना विशिष्ट अंतरावर जरी बसविले तरी ते एकमेकांच्या संपर्कात येणार आहेत. त्यामुळे हे वर्षे या चिमुकल्यांचे घरी जाणार आहे. घरी बसल्या मुलांना ऑनलाईनच्या माध्यमातून बाराखडी व अक्षर ओळख करून देण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे.

पहिली ते चौथीच्या मुलांना बळजबरीने मोबाईल समोर बसावे लागते. गुरुजी काय शिकवितात, याकडे त्यांचे लक्ष राहत नाही. वर्गात बसवून गुरुजी त्यांच्याकडून तयारी करून घेतात. पाठांतर घेता येते. परंतु, ऑनलाईनद्वारे ते शक्य होताना दिसत नाही. पालकांनी सांगून विद्यार्थी ऐकत नाहीत. काही ना काही कारण देत अभ्यास करण्यास नकार देतात. गुरुजींनी दिलेला अभ्यासही विद्यार्थी करत नाहीत. अभ्यास पूर्ण केला तरी तो पाठवायचा कसा, त्यात असलेल्या चुका दुरुस्त कशा करायच्या, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. अशा विद्यार्थ्यांना अजून अक्षर ओळखही झालेली नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे सध्या हे विद्यार्थी धमाल करताना दिसतात. शाळेबाबत विचारले असता शाळेला सुट्टी आहे, असे उत्तर मिळते. चिमुकले सध्या सुट्टीच्याच मूडमध्ये असल्याने त्यांना अभ्यासाचा विसर पडला आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे काही पालक सांगतात.

.....

अक्षर ओळख होईना

पहिली, दुसरीच्या मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. परंतु, त्यांची शाळा भरलेली नाही. काही शाळा ऑनलाईन शिकवित आहेत. परंतु, विद्याथ्यांना ऑनलाईन शिकवलेले समजत नाही. मोबाईलसमोर हे विद्यार्थी बसत नाहीत. बळजबरीने बसविले तरी त्यांचे मन लागत नाही. मोबाईल सुरू ठेवून चिमुकले दुसरे काही तरी करीत बसतात. पालकांनाही त्यांच्यासमोर बसायला वेळ नसतो. त्यामुळे चिमुकल्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे.

..

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळेला सुट्टी असल्याने मुले अभ्यास करत नाहीत. अभ्यासाला बसविले तरी काही ना काही कारण सांगत ते अभ्यास करणे टाळतात.

अ- गुरुजींनी शिकवलेले समजले नाही, अभ्यास कसा करू

ब- मोबईलची रेंज गेली हाेती. त्यामुळे मला समजले नाही

क- डोळे व डोके दुखत असल्याचे कारण तर नेहमीच सांगितले जाते

ड- अभ्यासाला बसविल्यास कंटाळा तो ही एक कारण असते

......

पालकांनी घरातच घ्यावी शाळा

कोरोनाची लाट ओसरून शाळा सुरू होतील. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, अशा अशा पालकांना आहे. परंतु, शाळा सुरू हाेणे शक्य नसल्याने मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पालकांनीच मुलांचा नियमित अभ्यास घेणे गरजेचे आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांचे हे वर्षही घरी जाईल. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच घरीच तयारी करून घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

......

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पहिली- ६८ हजार ७१६

दुसरी- ७४ हजार ८९६

तिसरी- ७८ हजार ४५१

चौथी- ८० हजार ४४९

..........

शाळेत मुलांना शिक्षकांचा धाक असतो. त्यामुळे मुले घरी अभ्यास करतात. परंतु, घरी ऑनलाईनमुळे त्यांना धाक राहत नाही. चार दोन शब्द लिहिल्याने त्यांचा अभ्यास पूर्ण होत नाही. दुसरीच्या मुलींला साधी अक्षर ओळखही नाही. यामुळे मुलांचा पाया कच्चा राहण्याची भीती आहे.

- संदीप मुसळे, पालक पिपरी शहाली. ता. नेवासा

......

ऑनलाईनमुळे मुले अभ्यास करत नाहीत. छोट्या मुलांना गुरुजी काय शिकवितात, ते समजत नाही. त्यामुळे ते अभ्यास करत नाहीत. मुलांचा पाया कच्चा राहिल्याने पुढे अडचणी येतील.

- अत्माराम घुणे, पालक. सुलतानपूर, ता. शेवगाव