शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

‘जलयुक्त’ च्या कामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 23:49 IST

अहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़

खर्चाची घेणार माहिती : राज्य लेखा परीक्षण समितीकडून कामांची पाहणीअहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़ जिल्ह्यातील कामांना भेटी देवून कामाची गुणवत्ता, त्यापासून होणारा लाभ आणि त्यावर झालेल्या खर्चाची माहिती घेणार असल्याने संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहे़ राज्य लेखा परीक्षण विभागाची त्रिसदस्यीय समिती नगरमध्ये दाखल झाली आहे़ जिल्हा अधीक्षक कृषी विभागाचे भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या ‘जलयुक्त’च्या कामांची माहिती मंगळवारी समिती सदस्यांना दिली़ कामांची माहिती घेऊन ही समिती जिल्ह्यातील निवडक गावांना भेटी देणार आहे़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची गुणवत्ता व उपयोगिता ही समिती तपासणार आहे़ तसेच गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावात कामे झाली का? झालेल्या कामांमुळे शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे़ शेतकऱ्यांचे याबाबत काय म्हणणे आहे, याची माहिती घेऊन समिती अहवाल तयार करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़ सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या कामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत़ त्याचे समितीकडून निराकारण करण्यात येणार आहे़ मागील वर्षी जिल्ह्यात २७९ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली होती़ निवड झालेल्या गावांत १३ हजार १३८ कामे हाती घेण्यात आली आहेत़ त्यापैकी १२ हजार ८७८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २६० कामे प्रगतिपथावर आहेत़ त्यावर १७३ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले आहेत़ श्रीरामपूर तालुका ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करण्यात आघाडीवर आहे़ सदर तालुक्यातील २५४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ यापैकी निवडक कामांची पाहणी लेखा परीक्षण समितीकडून करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)त्रयस्थ संस्थेकडून कामांची चौकशीजिल्हा नियोजन समितीकडून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची तपासणी करण्यासाठी पुणे येथील गोखले इन्स्टिट्युटची नियुक्ती करण्यात आली आहे़ संस्थेच्या पथकाने जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची तपासणी करून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केले आहेत़ जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडून यासंदर्भात अहवाल मागविला आहे़जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २७९ गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत़ या कामांची तपासणी करण्यासाठी राज्य लेखा परीक्षण समिती दाखल झाली आहे़ समितीकडून काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी करणार आहे़- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक