शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

‘जलयुक्त’ च्या कामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 23:49 IST

अहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़

खर्चाची घेणार माहिती : राज्य लेखा परीक्षण समितीकडून कामांची पाहणीअहमदनगर : राज्याची लेखा परीक्षण समिती जिल्ह्यात दाखल झाली असून, या समितीकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी सुरू झाली आहे़ जिल्ह्यातील कामांना भेटी देवून कामाची गुणवत्ता, त्यापासून होणारा लाभ आणि त्यावर झालेल्या खर्चाची माहिती घेणार असल्याने संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहे़ राज्य लेखा परीक्षण विभागाची त्रिसदस्यीय समिती नगरमध्ये दाखल झाली आहे़ जिल्हा अधीक्षक कृषी विभागाचे भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या ‘जलयुक्त’च्या कामांची माहिती मंगळवारी समिती सदस्यांना दिली़ कामांची माहिती घेऊन ही समिती जिल्ह्यातील निवडक गावांना भेटी देणार आहे़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची गुणवत्ता व उपयोगिता ही समिती तपासणार आहे़ तसेच गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावात कामे झाली का? झालेल्या कामांमुळे शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे़ शेतकऱ्यांचे याबाबत काय म्हणणे आहे, याची माहिती घेऊन समिती अहवाल तयार करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़ सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या कामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत़ त्याचे समितीकडून निराकारण करण्यात येणार आहे़ मागील वर्षी जिल्ह्यात २७९ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली होती़ निवड झालेल्या गावांत १३ हजार १३८ कामे हाती घेण्यात आली आहेत़ त्यापैकी १२ हजार ८७८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २६० कामे प्रगतिपथावर आहेत़ त्यावर १७३ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले आहेत़ श्रीरामपूर तालुका ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करण्यात आघाडीवर आहे़ सदर तालुक्यातील २५४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ यापैकी निवडक कामांची पाहणी लेखा परीक्षण समितीकडून करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)त्रयस्थ संस्थेकडून कामांची चौकशीजिल्हा नियोजन समितीकडून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची तपासणी करण्यासाठी पुणे येथील गोखले इन्स्टिट्युटची नियुक्ती करण्यात आली आहे़ संस्थेच्या पथकाने जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची तपासणी करून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केले आहेत़ जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडून यासंदर्भात अहवाल मागविला आहे़जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २७९ गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत़ या कामांची तपासणी करण्यासाठी राज्य लेखा परीक्षण समिती दाखल झाली आहे़ समितीकडून काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी करणार आहे़- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक