शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मद्याचे उत्पादन तपासणार

By admin | Updated: April 29, 2016 23:30 IST

अहमदनगर : मद्यासह आसवनी निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्यात पन्नास टक्के कपात करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. मात्र, ही कपात झाली की नाही हे पाहण्यासाठी प्रशासन मद्याचे उत्पादन तपासणार आहे.

अहमदनगर : मद्यासह आसवनी निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्यात पन्नास टक्के कपात करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. मात्र, ही कपात झाली की नाही हे पाहण्यासाठी प्रशासन मद्याचे उत्पादन तपासणार आहे. मद्याचे उत्पादन जैसे थे आढळल्यास न्यायालयीन अवमानाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी या कारखान्यांना दिला. मद्यनिर्मितीच्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात करून, यामुळे वाचणारे पाणी दुष्काळी भागाला पुरविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव तसेच पाटबंधारे आणि ग्रामीण पाणीुपरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते़ जिल्ह्यात मद्यनिर्मिती करणारे १० तर आसवनीचे ११ कारखाने आहेत़ कारखान्यांतील मद्य व आसवनी निर्मितीसाठी दररोज १४ कोटी ४० लाख ३७ हजार ८९७ लीटर पाण्याचा वापर होतो़ यापैकी निम्मे पाणी कारखान्यांनी स्वत:च पिण्यासाठी उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन हे पाणी कोणत्या गावांना पुरवायचे याचा निर्णय कारखान्यांनी घ्यावयाचा आहे. धरणाच्या पाण्यासोबतच कारखान्यांना स्वत:च्या अथवा इतर स्त्रोतांचे पाणी देखील वापरता येणार नाही. पाण्याची कपात झाल्यानंतर मद्याचे उत्पादनही आपोआप घटून ते निम्म्यावर यायला हवे. त्यामुळे प्रशासन उत्पादनाची आकडेवारी तपासून खातरजमा करणार आहे. घट न आढळल्यास कारखान्यांनी पाणी वापरले असे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)एमआयडीसीचे पाणी पिण्यासाठीनगरसह सुपा आणि नेवासा औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांना मुळा धरणातून नियमित पाणी पुरवठा करण्यात येतो. या उद्योगांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात पहिल्या टप्प्यात २० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे वाचलेले पाणी गरजेनुसार दुष्काळग्रहस्त गावांना उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र मुळा पाटबंधारे विभागाने एमआयडीसी प्रशासनास दिले आहे. सध्या नागापूर, सुपा आणि पांढरीपूल येथील एमआयडीसीच्या उपकेंद्रातून परिसरातील गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. म्हणजेच एमआयडीसीच्या पाण्यातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालेले आहे. याशिवाय २० टक्क्यांपर्यंतचे पाणी यापुढील काळात पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागापूर, सुपा आणि नेवासा औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांना दररोज २० टक्के पाणी कमी मिळणार असल्याने ऐन दुष्काळात त्यांना पाण्याची टंचाई भासणार आहे.जिल्ह्यातील मद्य व आसवनी प्रकल्पांचे दररोज ७ कोटी लीटर पाणी आता पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.