शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

मद्याचे उत्पादन तपासणार

By admin | Updated: April 29, 2016 23:30 IST

अहमदनगर : मद्यासह आसवनी निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्यात पन्नास टक्के कपात करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. मात्र, ही कपात झाली की नाही हे पाहण्यासाठी प्रशासन मद्याचे उत्पादन तपासणार आहे.

अहमदनगर : मद्यासह आसवनी निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्यात पन्नास टक्के कपात करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. मात्र, ही कपात झाली की नाही हे पाहण्यासाठी प्रशासन मद्याचे उत्पादन तपासणार आहे. मद्याचे उत्पादन जैसे थे आढळल्यास न्यायालयीन अवमानाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी या कारखान्यांना दिला. मद्यनिर्मितीच्या कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात करून, यामुळे वाचणारे पाणी दुष्काळी भागाला पुरविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव तसेच पाटबंधारे आणि ग्रामीण पाणीुपरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते़ जिल्ह्यात मद्यनिर्मिती करणारे १० तर आसवनीचे ११ कारखाने आहेत़ कारखान्यांतील मद्य व आसवनी निर्मितीसाठी दररोज १४ कोटी ४० लाख ३७ हजार ८९७ लीटर पाण्याचा वापर होतो़ यापैकी निम्मे पाणी कारखान्यांनी स्वत:च पिण्यासाठी उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन हे पाणी कोणत्या गावांना पुरवायचे याचा निर्णय कारखान्यांनी घ्यावयाचा आहे. धरणाच्या पाण्यासोबतच कारखान्यांना स्वत:च्या अथवा इतर स्त्रोतांचे पाणी देखील वापरता येणार नाही. पाण्याची कपात झाल्यानंतर मद्याचे उत्पादनही आपोआप घटून ते निम्म्यावर यायला हवे. त्यामुळे प्रशासन उत्पादनाची आकडेवारी तपासून खातरजमा करणार आहे. घट न आढळल्यास कारखान्यांनी पाणी वापरले असे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)एमआयडीसीचे पाणी पिण्यासाठीनगरसह सुपा आणि नेवासा औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांना मुळा धरणातून नियमित पाणी पुरवठा करण्यात येतो. या उद्योगांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात पहिल्या टप्प्यात २० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे वाचलेले पाणी गरजेनुसार दुष्काळग्रहस्त गावांना उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र मुळा पाटबंधारे विभागाने एमआयडीसी प्रशासनास दिले आहे. सध्या नागापूर, सुपा आणि पांढरीपूल येथील एमआयडीसीच्या उपकेंद्रातून परिसरातील गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. म्हणजेच एमआयडीसीच्या पाण्यातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालेले आहे. याशिवाय २० टक्क्यांपर्यंतचे पाणी यापुढील काळात पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागापूर, सुपा आणि नेवासा औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांना दररोज २० टक्के पाणी कमी मिळणार असल्याने ऐन दुष्काळात त्यांना पाण्याची टंचाई भासणार आहे.जिल्ह्यातील मद्य व आसवनी प्रकल्पांचे दररोज ७ कोटी लीटर पाणी आता पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.