शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे

By admin | Updated: March 31, 2017 19:15 IST

लग्नकार्यात मानपान देणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आॅनलाइन लोकमत
 
अकोले (अहमदनगर), दि. ३१ - काळाची गरज ओळखून आदिवासी समाजात ‘सामुदायिक विवाह सोहळा’ रुजविण्याचा निर्धार शेंडी भंडारदरा येथे आदिवासी मित्र मंडळ व पश्चिम पट्टा आदिवासी वारकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच लग्नकार्यात व हळदी समारंभात मानपान देणे घेणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
शेंडी (भंडारदरा) येथील दत्त मंदिरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या आदिवासी मेळाव्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, काशिनाथ  साबळे, मारुती लांघी, बाबूराव अस्वले, प्रा.दिलीप रोंगटे, सुरेश गभाले, देवराम महाराज इदे, तुकाराम महाराज बांडे, लक्ष्मण उघडे, पांडुरंग इदे, विठ्ठल खाडे, आनंद खाडे, आनंद मधे, सीताराम झडे, पुनाजी सगभोर आदी उपस्थित होते. 
लग्नात मानापानाच्या नावाखाली हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. ढांगाढोंगावर मोठा खर्च होतो. या सर्व बाबींवर निर्बंध म्हणून सामुदायिक विवाह सोहळा ही काळची गरज असल्याने आदिवासी मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह चळवळ राबविली जाणार आहे. योग्य त्या कागदपत्रांसह नावनोंदणी करून वधूवरांकडून प्रत्येकी ५०० रुपये, १ पोते तांदूळ घेऊन मंडळामार्फत वधू-वराचे कपडे, हळदी समारंभ, पुरोहित, लाईट मंडप व जेवणाचा खर्च केला जाणार आहे. अमृतेश्वर मंदिर रतनवाडी,भंडारदरा येथील धरणाच्या पायथ्याची बाग, घोरपडा देवी मंदिर रंधा आदी ठिकाणी सामुदाईक विवाह सोहळ्यांचे विभागवार आयोजन करण्याचे यावेळी ठरले. आदिवासी समाजात हे क्रांतिकारक पाऊल उचलले जात असल्याने २ मे रोजी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १०१ विवाह करण्याचा मानस अशोक भांगरे यांनी यावेळी व्यक्त केला.