शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे

By admin | Updated: March 31, 2017 19:15 IST

लग्नकार्यात मानपान देणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आॅनलाइन लोकमत
 
अकोले (अहमदनगर), दि. ३१ - काळाची गरज ओळखून आदिवासी समाजात ‘सामुदायिक विवाह सोहळा’ रुजविण्याचा निर्धार शेंडी भंडारदरा येथे आदिवासी मित्र मंडळ व पश्चिम पट्टा आदिवासी वारकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच लग्नकार्यात व हळदी समारंभात मानपान देणे घेणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
शेंडी (भंडारदरा) येथील दत्त मंदिरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या आदिवासी मेळाव्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, काशिनाथ  साबळे, मारुती लांघी, बाबूराव अस्वले, प्रा.दिलीप रोंगटे, सुरेश गभाले, देवराम महाराज इदे, तुकाराम महाराज बांडे, लक्ष्मण उघडे, पांडुरंग इदे, विठ्ठल खाडे, आनंद खाडे, आनंद मधे, सीताराम झडे, पुनाजी सगभोर आदी उपस्थित होते. 
लग्नात मानापानाच्या नावाखाली हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. ढांगाढोंगावर मोठा खर्च होतो. या सर्व बाबींवर निर्बंध म्हणून सामुदायिक विवाह सोहळा ही काळची गरज असल्याने आदिवासी मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह चळवळ राबविली जाणार आहे. योग्य त्या कागदपत्रांसह नावनोंदणी करून वधूवरांकडून प्रत्येकी ५०० रुपये, १ पोते तांदूळ घेऊन मंडळामार्फत वधू-वराचे कपडे, हळदी समारंभ, पुरोहित, लाईट मंडप व जेवणाचा खर्च केला जाणार आहे. अमृतेश्वर मंदिर रतनवाडी,भंडारदरा येथील धरणाच्या पायथ्याची बाग, घोरपडा देवी मंदिर रंधा आदी ठिकाणी सामुदाईक विवाह सोहळ्यांचे विभागवार आयोजन करण्याचे यावेळी ठरले. आदिवासी समाजात हे क्रांतिकारक पाऊल उचलले जात असल्याने २ मे रोजी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १०१ विवाह करण्याचा मानस अशोक भांगरे यांनी यावेळी व्यक्त केला.