शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे

By admin | Updated: March 31, 2017 19:15 IST

लग्नकार्यात मानपान देणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आॅनलाइन लोकमत
 
अकोले (अहमदनगर), दि. ३१ - काळाची गरज ओळखून आदिवासी समाजात ‘सामुदायिक विवाह सोहळा’ रुजविण्याचा निर्धार शेंडी भंडारदरा येथे आदिवासी मित्र मंडळ व पश्चिम पट्टा आदिवासी वारकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच लग्नकार्यात व हळदी समारंभात मानपान देणे घेणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
शेंडी (भंडारदरा) येथील दत्त मंदिरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या आदिवासी मेळाव्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, काशिनाथ  साबळे, मारुती लांघी, बाबूराव अस्वले, प्रा.दिलीप रोंगटे, सुरेश गभाले, देवराम महाराज इदे, तुकाराम महाराज बांडे, लक्ष्मण उघडे, पांडुरंग इदे, विठ्ठल खाडे, आनंद खाडे, आनंद मधे, सीताराम झडे, पुनाजी सगभोर आदी उपस्थित होते. 
लग्नात मानापानाच्या नावाखाली हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. ढांगाढोंगावर मोठा खर्च होतो. या सर्व बाबींवर निर्बंध म्हणून सामुदायिक विवाह सोहळा ही काळची गरज असल्याने आदिवासी मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह चळवळ राबविली जाणार आहे. योग्य त्या कागदपत्रांसह नावनोंदणी करून वधूवरांकडून प्रत्येकी ५०० रुपये, १ पोते तांदूळ घेऊन मंडळामार्फत वधू-वराचे कपडे, हळदी समारंभ, पुरोहित, लाईट मंडप व जेवणाचा खर्च केला जाणार आहे. अमृतेश्वर मंदिर रतनवाडी,भंडारदरा येथील धरणाच्या पायथ्याची बाग, घोरपडा देवी मंदिर रंधा आदी ठिकाणी सामुदाईक विवाह सोहळ्यांचे विभागवार आयोजन करण्याचे यावेळी ठरले. आदिवासी समाजात हे क्रांतिकारक पाऊल उचलले जात असल्याने २ मे रोजी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १०१ विवाह करण्याचा मानस अशोक भांगरे यांनी यावेळी व्यक्त केला.