शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

चाळिशीत पारा... घामाच्या धारा

By admin | Updated: May 28, 2014 00:14 IST

अहमदनगर : तापमानाच्या पार्‍याने चाळिशी ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नगरचे तापमान ४१ ते ४२ अंशावर पोहोचले आहे.

अहमदनगर : तापमानाच्या पार्‍याने चाळिशी ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नगरचे तापमान ४१ ते ४२ अंशावर पोहोचले आहे. वातावरणामध्ये प्रचंड उकाडा असल्याने नगरकर हैराण झाले आहेत. पंखे, कुलर, एसी अशा उपाययोजनांवरही मर्यादा आल्या आहेत. रात्रं-दिवस अंगातून अक्षरक्ष: घामाच्या धारा ओघळत आहेत. उकाड्यामुळे नगरचे मुंबई झाले आहे. कडाक्याचे उन्हामुळे दुपारच्यावेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. वैशाख महिना हा सर्वात कडक उन्हाचा महिना असल्याची झलक सध्या नगरकरांना येत आहे. बुधवारी आमावस्या असल्याने वैशाख महिनाही संपला असून रोहिणी नक्षत्र लागल्याने पावसाचे वेध लागले आहेत. अशा स्थितीत उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. गेल्या दोन दिवसांतील तापमानाचा पारा ४१, ४१.९ आणि ४२ अंशावर गेले आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसत आहे. रस्त्यावरील रहदारीही कमी झाली आहे. दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे. दुपारी दुचाकीवर जाणारे उन्हाचा बंदोबस्त करूनच बाहेर पडत आहेत. डोळ््याला गॉगल, कानाला आणि डोक्याला रुमाल, डोक्यावर टोप्या घालूनच नगरकर बाहेर पडत आहेत. महिला छत्रीचाही आधार घेत आहेत. विक्रेते दुपारच्या वेळी गायब झाले होते. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. बाहेर कडाक्याचे उन आणि घरामध्ये प्रचंड उकाडा असल्याने नगरकर त्रस्त झाले आहेत. उकाड्यामुळे अक्षरश: अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. कुलर्स, पंखे, एसी लावले तरी उकाडा कमी होताना दिसत नाही. घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तरी वारा बंद असल्याचे त्याचा काहीच उपयोग होत नाही. अनेक जण घराच्या गच्चीवर, घरासमोर झोपत आहेत. वसाहतींमध्ये रात्रीचे जागरणही वाढले आहे. उकाड्यामुळे घराच्या बाहेर येऊन अनेकजण रात्री काढत आहेत. रात्रीचा उकाडा वाढल्यामुळे अनेकांच्या झोपाही गायब झाल्या आहेत.