शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

महा-ई सेवामुळे महासंकट

By admin | Updated: June 4, 2014 00:13 IST

अहमदनगर : महा ई सेवामुळे विद्यार्थी आणि नागरिकांपुढे महासंकट उभे ठाकले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लोकांना दाखलेच मिळत नाहीत.

अहमदनगर : महा ई सेवामुळे विद्यार्थी आणि नागरिकांपुढे महासंकट उभे ठाकले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लोकांना दाखलेच मिळत नाहीत. प्रशासनाने सेतू सेवा बंद केल्याने त्यात भरच पडली आहे. काही केंद्रांतून तर अक्षरश: प्रकरणेच गहाळ झाली आहेत. प्रत्येक प्रकरणासाठी जास्तीचे पैसे आकारले जातात. एकेका केंद्रात हजारो दाखले अडकले आहेत. सावेडीतील तहसील कार्यालयासमोरील महा ई सेवा केंद्रावर लोकांची अडवणूक होत आहे. सध्या शाळा, कॉलेज सुरू होण्याचे दिवस असल्याने उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी, नागरिकत्व, नॉन क्रिमिलेअर आदी दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. परंतु याचे कोणतेही नियोजन या उपकेंद्रात नाही. तहसील कार्यालयाने ठरवून दिलेल्या मुदतीऐवजी मनमानी पद्धतीने पुढची तारीख टाकून पावत्या दिल्या जातात. संबंधित तारखेस लाभार्थी गेल्यास अजून झाले नाही, नंतर या, माणसे कमी आहेत, एकच काम आहे का, जेव्हा होईल तेव्हा देऊ, अशी अरेरावीची उत्तरे दिली जातात. सहा-सहा महिने एकाच दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. कागदपत्रे सापडली नाही, तर पुन्हा प्रकरण दाखल करा, असे सांगण्यापर्यंत कर्मचार्‍यांची मजल जाते. वृद्ध, शालेय विद्यार्थी, खेडेगावातून आलेले शेतकरी यांच्या मोठ्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी) सॉफ्टवेअरमध्ये फरक आता सेतू बंद झाल्याने माहिती व सेवा उपकेंद्र सुरू करण्यात आले. आधीच्या व आताच्या सॉफ्टवेअरमध्ये फरक आहे. त्यामुळे विलंब लागतो. - सुनील लांगोरे, संचालक, सेवा उपकेंद्रकाय आहे अडचण जिल्हा प्रशासनाने सेतू बंद करून त्यांना महा ई सेवा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्यांना महा ई सेवा सुरू करण्यास जुने केंद्रचालक आडकाटी करीत आहेत. नवीन केंद्र सुरू न केल्याने महा ई सेवा केंद्रांत गर्दी होत आहे. या केंद्र चालकांना सरकारने नवीन सॉफ्टवेअर दिले आहे. त्याची क्षमता कमी असल्याने दिवसाकाठी मोजकेच प्रकरणे तयार होतात. महा ई सेवाकडील तसेच सेतूवाल्यांकडील सॉफ्टवेअरमुळे दाखल्यांची जास्त होती. ती वापरण्यास सरकारने मनाई केली आहे. सहा महिन्यांपासन हेलपाटे माझ्या भाचीचे जातीच्या दाखल्याचे प्रकरण जमा करून सहा महिने झाले. परंतु अद्याप दाखला मिळालेला नाही. प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून टाळाटाळ केली जाते. त्यामुळे याप्रकरणी नायब तहसीलदारांकडे लेखी तक्रार दिली आहे. - जितेंद्र आरू, विद्यार्थी आठवड्याने या... मी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दि. २७ मे रोजी प्रकरण टाकलं आहे. उत्पन्नाचा दाखला तीन दिवसांनी मिळतो असे मला येथून समजले. मी दि. ३ जून रोजी आलो. परंतु दाखला तयार नाही, पुढील आठवड्यात या, असे सांगितले आहे. आमच्यासारख्या म्हातार्‍यांनी किती चकरा मारायच्या? - लक्ष्मण आव्हाड, वृद्ध शेतकरीतर काळ्या यादीत टाकू अर्ज केल्यानंतर ठरलेल्या मुदतीत दाखले देणे सेवा उपकेंद्रांना बंधनकारक आहे. जास्तीत जास्त १५-२० दिवसांत कोणताही दाखला मिळणे क्रमप्राप्त आहे. सहा-सहा महिने लागत असतील तर चौकशी करून संबंधित उपकेंद्र काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होऊ शकते. - माधुरी आंधळे, नायब तहसीलदार