शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

भारनियमनाचा भडका रस्त्यावर

By admin | Updated: May 24, 2014 00:41 IST

अहमदनगर : शहरात वेळी अवेळी सुरू असलेले भारनियमन दोन दिवसांत थांबवा अन्यथा अधिकार्‍यांच्या तोेंडाला काळे फासू

अहमदनगर : शहरात वेळी अवेळी सुरू असलेले भारनियमन दोन दिवसांत थांबवा अन्यथा अधिकार्‍यांच्या तोेंडाला काळे फासू आणि त्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून घेऊ असा इशारा शिवसेनेचे आ. अनिल राठोड यांनी दिला. भारनियमन प्रश्नी काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी राठोड बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील भारनियमन प्रश्नी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, विक्रम राठोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सुरूवातीला मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राठोड म्हणाले की, दिवसभर शहरात वीज गायब असते. सोबत रात्रीच्या वेळी अतिरिक्त अथवा तातडीच्या भारनियमनाच्या नावाखाली वीज पुरवठा बंद करण्यात येतो. यामुळे अबालवृध्दांसोबत आजारी माणसांचे मोठे हाल होतात. एकीकडे प्रामाणिकपणे काही वीज ग्राहक बिल भरतात. त्यांना बिल न भरणार्‍यांच्या पंक्तीत बसविण्यात येत आहे. हा प्रकार चुकीचा आहे. भारनियमन प्रश्नावर उत्तर देण्यासाठी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने महावितरण कडून पाठविण्यात आलेल्या दुय्यम अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यास राठोड यांनी नकार दिला. तसेच दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा दिला. यावेळी कदम यांचेही भाषण झाले. यावेळी सुषमा पडोळे, निर्मला धुपधरे आणि महापालिकेतील पक्षाच्या नगरसेविका उपस्थित होत्या. (प्रतिनिधी) यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तातडीने महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, राठोड यांनी अधीक्षक अभियंता यांच्यासोबत बैठक घेण्याचा आग्रह धरला. आज शनिवारी ही बैठक होणे अपेक्षित आहे. नगर शहरात कोणत्याही भागात, कोणत्याही वेळी वीज गायब झाल्यास मला फोन करा, असे आवाहन राठोड यांनी यावेळी केले. मोर्चा दुपारी १२ वाजता निघाला होता. यावेळी गर्दी कमी असल्याचे जाणवले.