शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शालेय पोषण आहारासाठी स्मार्ट कार्ड योजना आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

शिक्षक भारती संघटनेच्यावतीने माध्यमिक शिक्षण विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. मध्यान्ह भोजन योजनेत शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी येत असल्याने ...

शिक्षक भारती संघटनेच्यावतीने माध्यमिक शिक्षण विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. मध्यान्ह भोजन योजनेत शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी येत असल्याने ही योजना पूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे शासनाने यापुढे मध्यान्ह भोजनासाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकण्याची तयारी केली आहे. लाभ थेट विद्यार्थ्यांना मिळावा हा शासनाचा उद्देश उत्तम असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये ही योजनादेखील अडचणीत येणारी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वर्ग १ ते ८ चे विद्यार्थी सज्ञान नसल्याने नियमानुसार त्यांना पालकांची मदत घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे अजूनही बँकेत खाते नसल्याने कोरोनाकाळात विद्यार्थी व पालकांना बँकेत येरझाऱ्या घालाव्या लागणार आहेत. अनेक शासकीय योजनांचा लाभ आता थेट बँकेत येत असल्याने तोकड्या बँकिंग व्यवस्थेमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत हजारो विद्यार्थी व पालक खाते काढण्यासाठी बँकेत आल्यास ही व्यवस्थाच कोलमडून पडेल.

शासनाने रक्कम खात्यात जमा करण्याऐवजी रास्त धान्य दुकानातून आवश्यक खाद्यान्न विद्यार्थ्यांना वितरित करावे. ही वितरण व्यवस्था आधीपासूनच अस्तित्वात असल्यामुळे वेगळे काही करण्याची गरज लागणार नाही व विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावातच सकस आहाराचे साहित्य मिळेल, अशी मागणी जगताप यांच्यासह राज्य सचिव सुनील गाडगे, जितेंद्र आरू, महेश पाडेकर, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, मोहम्मद समी शेख, रूपालीताई कुरुमकर, हनुमंत रायकर, कैलास जाधव, संभाजी पवार, नवनाथ घोरपडे, संतोष शेंदुरकर, सुरेश जगताप, सूर्यकांत बांदल, विलास वाघमोडे, विलास माने, राजेंद्र भगत, सचिन जासुद, अमोल चंदनशिवे, मफीज इनामदार, रामराव काळे, सिकंदर शेख, सुदर्शन ढगे, संजय तमनर, नानासाहेब काटे, मुकुंद आंचवले, सुदाम दिघे यांनी केली आहे.