शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

नगरच्या एमआयडीसीला महाविकास आघाडीचा बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

अहमदनगर : नगर एमआयडीसीतील विकासाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्याचे जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांनी मनावर घेतलेले ...

अहमदनगर : नगर एमआयडीसीतील विकासाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्याचे जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांनी मनावर घेतलेले आहे, हे महिनाभरात उद्योजकांसोबत झालेल्या बैठकांवरून दिसून आले आहे. नगरच्या उद्योगाबाबत प्रथमच एवढ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शासन दरबारी पाठपुरावा झाल्यास महाविकास आघाडीकडून नगरच्या एमआयडीसीसाठी हा एकप्रकारे बूस्टर डोस ठरणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साखर कारखान्यांचे मोठे जाळे आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. तसा प्रयत्न इतर उद्योग आणण्यासाठी यापूर्वी झाला नाही. नगरची औद्योगिक वसाहत आजही मोठ्या कंपन्यांच्या प्रतीक्षेत आहे. मोठ्या कंपन्या सहजासहजी येत नाहीत. त्यासाठी पोषक वातावरण तयार करावे लागते; परंतु हे सर्व करणार कोण, पुढाकार कुणी घ्यायचा? आणि घेतलाच तर इतर नेते पाठिंबा देतील का? ही नगरच्या एमआयडीसीसमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. नगरचा औद्योगिक विकास करणार, हा विषय आजवर केवळ निवडणुकांच्या जाहीरनाम्यापुरता मर्यादित राहिला. महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने किमान एमआयडीसीतील प्रश्नांवर आज चर्चा तरी होऊ लागली आहे. सध्या कोणत्याही निवडणुका नसताना एमआयडीसीच्या प्रश्नावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ असावी. यानिमत्ताने फायलींवरील धूळ झटकली गेल्याने नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महाविकास आघाडीकडूनही जिल्ह्यातील तरुणाईला मोठी अपेक्षा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी आमदार, मंत्र्यांनी बैठकांच्या माध्यमातून पुढाकार तर घेतला आहे; परंतु त्यासाठी पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे. तसे झाले तरच नगरच्या उद्योगाला गती मिळेल. उद्योग वाढीसाठी अपेक्षित असलेली राजकीय इच्छाशक्ती यानिमित्ताने लाभली आहे; पण त्यात सातत्य राहिले तरच इथे नवीन कंपन्या येण्यास तयार होतील. तरुणाईच्या हाताला रोजगार मिळेल. पुणे, मुंबईची वाट त्यांना धरावी लागणार नाही.

...

आमदार, मंत्र्यांच्या बैठकांनी आशा पल्लवित

शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नागापूर एमआयडीसीतील बंद पडलेला आयटी पार्क सुरू केला. नवीन आयटी कंपन्या आणण्याचे आवाहनही त्यांनी इतर राजकीय पक्षांना खुल्या दिलाने केले. राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत येथील उद्योजकांसोबत बैठक घेतली. त्यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही उद्योजकांची बैठक घेतली. त्यानंतर मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक झाली. त्यानंतर जलसपंदामंत्री शंकरराव गडाख यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सोनई येथे नगरच्या उद्योजकांची बैठक घेतली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगरच्या उद्योगाबाबत प्रथमच बैठका झाल्या. त्यामुळे उद्योजकांसह जिल्हावासीयांच्याही अपेक्षा वाढल्या असून, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी वाढली आहे.