शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत योजना सुरू केली. भारतीय अन्न ...

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत योजना सुरू केली. भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने राज्य शासनाने कार्यवाही करावयाची असल्याने, आदिवासी क्षेत्रातील धान खरेदीसाठी मुख्य अभिकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या विभागाची नियुक्ती करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळामार्फत ३१ मार्चपर्यंत खरिपातील धान आणि भरडधान्य खरेदीसाठी राज्यातील आदिवासी भागात एकूण २४३ केंद्र उघडण्यात आली होती. या केंद्रांवर शेतकऱ्यांनी ३८ लाख २४ हजार ३४० क्विंटल धान आणि ७५ हजार १५ क्विंटल भरडधान्य विक्री केली होती. धान खरेदी वेळी शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव प्रमाणे म्हणजेच १ हजार ८६८ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर देण्यात आला होता, तर भरडधान्यासाठी वेगळा हमी भाव जाहीर केला होता. या हमीभाव प्रमाणे शासनाने सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली होती. यावेळी शासनाने ५० क्विंटलपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये याप्रमाणे बोनस जाहीर केला होता. मात्र, चार महिने होत आले, तरी शासनाने बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली नव्हती.

.....................

अकोले तालुक्यातील ४८१ आदिवासी शेतकऱ्यांनी ९ हजार २०० क्विंटल धान विक्री केली होती. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसच्या एकूण रकमेच्या ५० टक्के म्हणजे प्रति क्विंटल ७५० रुपयांपैकी ३५० रुपये रक्कम वर्ग करण्यात आली असून, उर्वरित ५० टक्के रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. - एन.एम. राजपूत, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय राजूर. ................