शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन फक्त चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

कोरोनापूर्वी जिल्ह्यात साखळी पद्धतीने चालणाऱ्या रक्तदान शिबिरांतून सर्वच रक्तपेढ्यांत दररोज हजारोंच्या संख्येत रक्तपिशव्या जमा होत होत्या. त्यातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना कधीच रक्ताचा तुटवडा भासला नाही. तसेच गैरसोयदेखील झाली नाही; परंतु कोरोनामुळे सार्वजनिकरीत्या होणाऱ्या रक्तदान शिबिरांना आधीच मर्यादा आल्या होत्या. त्यातूनही काहीसा मार्ग काढून रक्तपेढ्या रक्तसंकलनासाठी प्रयत्न करीत होत्या; परंतु लसीकरण सुरू झाल्याने रक्तसंकलनावर परिणाम झाला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे अनेक जणांना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही.

...................

शासकीय रक्तपेढीत सहा दिवसांचाच साठा

नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी वर्षाकाठी सुमारे सहा हजार रक्तपिशव्या उपलब्ध होत होत्या. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात त्या निम्म्यावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या या रक्तपेढीतून दररोज १५ ते २० रक्तपिशव्याची मागणी होत आहे. आता केवळ १०० रक्तपिशव्या शिल्लक असून, ते सरासरी सहा दिवसच पुरू शकेल, असे ब्लड बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

............

अहमदनगर ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ४०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर सार्वजनिक शिबिरांची संख्या घटली. त्यामुळे रक्त उपलब्ध होण्याचे प्रमाण १०० पिशव्यांवर आले. लसीकरणापासून तर रक्तदानाचे प्रमाण घटले असून, सध्या फक्त ४ ते ५ पिशव्या शिल्लक असल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

........

जनकल्याण ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ६०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर रक्तदान शिबिर होत नाही. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या फक्त २ ते ३ पिशव्या शिल्लक असून, हा साठा एक दिवससुद्धा पुरणार नसल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

...........

संजीवनी ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ३०० रक्तपिशव्या जमा होत. कोरोनानंतर रक्तदान शिबिरे कमी झाली. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण ५० टक्क्यावर आले. आता फक्त ५० रक्तपिशव्या शिल्लक आहेत.

..........

सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र फाउंडेशन तसेच इतर माध्यमांतून गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक वर्षात दोनवेळा रक्तदान शिबिरे घेऊन सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त रक्तपिशव्या रक्तपेढ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सध्याचा रक्ताचा तुटवडा पाहता तरुणांसह नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तपेढ्यांत जाऊन रक्तदान करावे.

- वैभव आढाव, अध्यक्ष, मित्र फाउंडेशन, कोपरगाव