शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन फक्त चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

कोरोनापूर्वी जिल्ह्यात साखळी पद्धतीने चालणाऱ्या रक्तदान शिबिरांतून सर्वच रक्तपेढ्यांत दररोज हजारोंच्या संख्येत रक्तपिशव्या जमा होत होत्या. त्यातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना कधीच रक्ताचा तुटवडा भासला नाही. तसेच गैरसोयदेखील झाली नाही; परंतु कोरोनामुळे सार्वजनिकरीत्या होणाऱ्या रक्तदान शिबिरांना आधीच मर्यादा आल्या होत्या. त्यातूनही काहीसा मार्ग काढून रक्तपेढ्या रक्तसंकलनासाठी प्रयत्न करीत होत्या; परंतु लसीकरण सुरू झाल्याने रक्तसंकलनावर परिणाम झाला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे अनेक जणांना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही.

...................

शासकीय रक्तपेढीत सहा दिवसांचाच साठा

नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी वर्षाकाठी सुमारे सहा हजार रक्तपिशव्या उपलब्ध होत होत्या. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात त्या निम्म्यावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या या रक्तपेढीतून दररोज १५ ते २० रक्तपिशव्याची मागणी होत आहे. आता केवळ १०० रक्तपिशव्या शिल्लक असून, ते सरासरी सहा दिवसच पुरू शकेल, असे ब्लड बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

............

अहमदनगर ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ४०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर सार्वजनिक शिबिरांची संख्या घटली. त्यामुळे रक्त उपलब्ध होण्याचे प्रमाण १०० पिशव्यांवर आले. लसीकरणापासून तर रक्तदानाचे प्रमाण घटले असून, सध्या फक्त ४ ते ५ पिशव्या शिल्लक असल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

........

जनकल्याण ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ६०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर रक्तदान शिबिर होत नाही. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या फक्त २ ते ३ पिशव्या शिल्लक असून, हा साठा एक दिवससुद्धा पुरणार नसल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

...........

संजीवनी ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ३०० रक्तपिशव्या जमा होत. कोरोनानंतर रक्तदान शिबिरे कमी झाली. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण ५० टक्क्यावर आले. आता फक्त ५० रक्तपिशव्या शिल्लक आहेत.

..........

सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र फाउंडेशन तसेच इतर माध्यमांतून गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक वर्षात दोनवेळा रक्तदान शिबिरे घेऊन सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त रक्तपिशव्या रक्तपेढ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सध्याचा रक्ताचा तुटवडा पाहता तरुणांसह नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तपेढ्यांत जाऊन रक्तदान करावे.

- वैभव आढाव, अध्यक्ष, मित्र फाउंडेशन, कोपरगाव