शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
3
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
4
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
5
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
6
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
7
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
8
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
9
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
10
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
11
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
12
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
13
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
14
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
15
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
16
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
17
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
18
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
19
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
20
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन फक्त चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

कोरोनापूर्वी जिल्ह्यात साखळी पद्धतीने चालणाऱ्या रक्तदान शिबिरांतून सर्वच रक्तपेढ्यांत दररोज हजारोंच्या संख्येत रक्तपिशव्या जमा होत होत्या. त्यातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना कधीच रक्ताचा तुटवडा भासला नाही. तसेच गैरसोयदेखील झाली नाही; परंतु कोरोनामुळे सार्वजनिकरीत्या होणाऱ्या रक्तदान शिबिरांना आधीच मर्यादा आल्या होत्या. त्यातूनही काहीसा मार्ग काढून रक्तपेढ्या रक्तसंकलनासाठी प्रयत्न करीत होत्या; परंतु लसीकरण सुरू झाल्याने रक्तसंकलनावर परिणाम झाला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे अनेक जणांना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही.

...................

शासकीय रक्तपेढीत सहा दिवसांचाच साठा

नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी वर्षाकाठी सुमारे सहा हजार रक्तपिशव्या उपलब्ध होत होत्या. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात त्या निम्म्यावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या या रक्तपेढीतून दररोज १५ ते २० रक्तपिशव्याची मागणी होत आहे. आता केवळ १०० रक्तपिशव्या शिल्लक असून, ते सरासरी सहा दिवसच पुरू शकेल, असे ब्लड बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

............

अहमदनगर ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ४०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर सार्वजनिक शिबिरांची संख्या घटली. त्यामुळे रक्त उपलब्ध होण्याचे प्रमाण १०० पिशव्यांवर आले. लसीकरणापासून तर रक्तदानाचे प्रमाण घटले असून, सध्या फक्त ४ ते ५ पिशव्या शिल्लक असल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

........

जनकल्याण ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ६०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर रक्तदान शिबिर होत नाही. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या फक्त २ ते ३ पिशव्या शिल्लक असून, हा साठा एक दिवससुद्धा पुरणार नसल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

...........

संजीवनी ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ३०० रक्तपिशव्या जमा होत. कोरोनानंतर रक्तदान शिबिरे कमी झाली. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण ५० टक्क्यावर आले. आता फक्त ५० रक्तपिशव्या शिल्लक आहेत.

..........

सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र फाउंडेशन तसेच इतर माध्यमांतून गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक वर्षात दोनवेळा रक्तदान शिबिरे घेऊन सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त रक्तपिशव्या रक्तपेढ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सध्याचा रक्ताचा तुटवडा पाहता तरुणांसह नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तपेढ्यांत जाऊन रक्तदान करावे.

- वैभव आढाव, अध्यक्ष, मित्र फाउंडेशन, कोपरगाव