शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन फक्त चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

कोरोनापूर्वी जिल्ह्यात साखळी पद्धतीने चालणाऱ्या रक्तदान शिबिरांतून सर्वच रक्तपेढ्यांत दररोज हजारोंच्या संख्येत रक्तपिशव्या जमा होत होत्या. त्यातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना कधीच रक्ताचा तुटवडा भासला नाही. तसेच गैरसोयदेखील झाली नाही; परंतु कोरोनामुळे सार्वजनिकरीत्या होणाऱ्या रक्तदान शिबिरांना आधीच मर्यादा आल्या होत्या. त्यातूनही काहीसा मार्ग काढून रक्तपेढ्या रक्तसंकलनासाठी प्रयत्न करीत होत्या; परंतु लसीकरण सुरू झाल्याने रक्तसंकलनावर परिणाम झाला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे अनेक जणांना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही.

...................

शासकीय रक्तपेढीत सहा दिवसांचाच साठा

नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी वर्षाकाठी सुमारे सहा हजार रक्तपिशव्या उपलब्ध होत होत्या. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात त्या निम्म्यावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या या रक्तपेढीतून दररोज १५ ते २० रक्तपिशव्याची मागणी होत आहे. आता केवळ १०० रक्तपिशव्या शिल्लक असून, ते सरासरी सहा दिवसच पुरू शकेल, असे ब्लड बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

............

अहमदनगर ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ४०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर सार्वजनिक शिबिरांची संख्या घटली. त्यामुळे रक्त उपलब्ध होण्याचे प्रमाण १०० पिशव्यांवर आले. लसीकरणापासून तर रक्तदानाचे प्रमाण घटले असून, सध्या फक्त ४ ते ५ पिशव्या शिल्लक असल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

........

जनकल्याण ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ६०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर रक्तदान शिबिर होत नाही. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या फक्त २ ते ३ पिशव्या शिल्लक असून, हा साठा एक दिवससुद्धा पुरणार नसल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

...........

संजीवनी ब्लड बँक

कोरोनाआधी महिन्याला ३०० रक्तपिशव्या जमा होत. कोरोनानंतर रक्तदान शिबिरे कमी झाली. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण ५० टक्क्यावर आले. आता फक्त ५० रक्तपिशव्या शिल्लक आहेत.

..........

सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र फाउंडेशन तसेच इतर माध्यमांतून गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक वर्षात दोनवेळा रक्तदान शिबिरे घेऊन सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त रक्तपिशव्या रक्तपेढ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सध्याचा रक्ताचा तुटवडा पाहता तरुणांसह नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तपेढ्यांत जाऊन रक्तदान करावे.

- वैभव आढाव, अध्यक्ष, मित्र फाउंडेशन, कोपरगाव