शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

निळवंडे होणार रिकामे

By admin | Updated: June 21, 2014 00:48 IST

राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु होणार असल्यामुळे हे धरण पूर्णपणे रिकामे करण्यात येणार आहे.

राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु होणार असल्यामुळे हे धरण पूर्णपणे रिकामे करण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि़२०) दुपारी निळवंडे धरणातून १ हजार ४०० क्यूसेसने पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले़निळवंडे धरणात पाणी साठविण्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे भंडारदरा धरणात अवघा १ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे़ पाणी सोडतेवेळी निळवंडेतील पाणीसाठा ६०० दशलक्ष घनफूट इतका होता. मृग नक्षत्र संपत आलेले असतानाही अखेरचा काठ कोरडा पडला आहे़ त्यामुळे या आवर्तनात ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून हे आवर्तन पाच दिवस चालणार असल्याचे जलसंपदाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले़ दरम्यान, मृगनक्षत्रात अद्यापही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे़ पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत होती़ मात्र, निळवंडेतून पिण्यासाठी आवर्तन सोडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या काही काळासाठी मिटली आहे़ (वार्ताहर)बोगदा उभारणीचे कामधरणाच्या पायथ्याशी ३ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या बोगद्याच्या उभारणीचे काम सुरु होणार आहे.हा बोगदा धरणाच्या ५९८ मीटर म्हणजेच धरणातील मृतपाणी साठ्याला लागून आहे़ त्यामुळे हे काम करण्यासाठी धरण पूर्णपणे रिकामे करावे लागणार आहे़ आवर्तन संपताच प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे़ बोगद्याचे काम १५ दिवस चालणार असल्याचे सांगण्यात आले़