शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूने शेतकरी मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST

संजय ठोंबरे चिचोंडी पाटील : दीड वर्षापूर्वी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च करून गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन सुरू केले. व्यवसायाला ...

संजय ठोंबरे

चिचोंडी पाटील : दीड वर्षापूर्वी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च करून गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन सुरू केले. व्यवसायाला कुठं नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र बर्ड फ्लूच्या एका आदेशाने दीड वर्षापासून पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या कोंबड्यांना डोळ्यादेखत प्रशासनाने जमिनीत गाडले.

चिचोंडी पाटील येथील शेतकरी प्रदीप सूर्यभान भद्रे यांनी ‘लोकमत’कडे याबाबत आपली कैफियत मांडली. चिचोंडी पाटील येथे एका कोंबडीचा बर्ड फ्लू अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासनाने त्या केंद्रापासून १ किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची, अंड्यांची, तसेच त्यांच्या खाद्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शुक्रवारी प्रशासनाने भद्रे यांच्या ६० कोंबड्या, ४३० पिले, तसेच ४३० अंडी नष्ट केली. या निर्णयामुळे एका क्षणात भद्रे यांचे स्वप्न भंगले. त्यामुळे अख्ख्या कुटुंबाचे डोळे पाणावले होते.

भद्रे यांनी दीड वर्षापूर्वी गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. खरं तर त्यांनी कोंबड्या विक्रीसाठी नव्हे, तर त्यांच्या अंडे विक्रीसाठी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी भद्रे यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे पाचशे ते आठशे रुपये देऊन एक एक कोंबडी जमा केली होती. आम्ही कोंबड्या कापण्यासाठी नाही तर त्या पाळून अंडी विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी कुक्कुटपालन केले. या सर्व कोंबड्या आयुर्वेद उपचार पद्धतीने रोगप्रतिकारक्षम बनविल्या होत्या. आमच्या कोंबड्यांची बर्ड फ्लू चाचणी केली तरी एकही कोंबडी पॉझिटिव्ह येणे शक्य नाही, असे ते आत्मविश्वासाने सांगत होते.

आजपर्यंत या कोंबड्यांसाठी सुमारे १२ लाखावर खर्च आला. दीड वर्षांपासून निरंतर कष्ट घेत जपलेल्या या कोंबड्यांना आम्ही घरच्यांसाठी किंवा पाहुणचारासाठीही कधी कापल्या नाहीत. चिकन खायचे तर बाहेरून आणून खाल्ले; पण आज कोंबड्यांना कोणताही आजार नसता प्रशासनाने जमितीत गाडल्याचे मोठे दु:ख होते, अशा भावना भद्रे यांनी व्यक्त केल्या.

------------

दीड वर्षांपासून घेतलेली अथक मेहनत पाण्यात गेली. आमच्या पोल्ट्रीत फक्त गावरान कोंबड्यांची पिल्लं विकसित केली होती. जी कोणत्याही कंपनीकडून मिळत नाहीत. आमच्या कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असता तर आम्हीच कोंबड्या नष्ट केल्या असत्या. परंतु दुसरीकडे कुठं अहवाल पाॅझिटिव्ह आला म्हणून आमच्याही कोंबड्यांवर संक्रांत कशासाठी?

- सूर्यभान भद्रे, शेतकरी, चिचोंडी पाटील