शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

कुष्ठधाम रस्त्याच्या रुंदीकरणाचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST

अहमदनगर : येथील पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणात पत्र्याचे शेड, विद्युत खांब, दुकानांचे पक्के बांधकाम आडवे येत ...

अहमदनगर : येथील पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणात पत्र्याचे शेड, विद्युत खांब, दुकानांचे पक्के बांधकाम आडवे येत आहे. पालिकेतील बांधकाम, पाणी पुरवठा आणि अतिक्रमण विभागांत समन्वय नाही. त्यामुळे हे काम रखडले असून, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

महापालिकेने सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्चून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ए. जी. वाबळे कंस्ट्रक्शन ॲण्ड हेवी मशनरीज कंपनीला १६ जून २०२०पर्यंत मुदत होती. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही, असा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र रुंदीकरणाच्या आड येणारी झाडे, विद्युत खांब, ड्रेनेजलाईन, पाण्याची लाईन आणि दुकानदारांची अतिक्रमणे पूर्णपणे काढण्यात आलेली नाहीत. तसे ठेकेदाराकडून वेळोवेळी रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. ही कामे बांधकाम, पाणी पुरवठा, उद्यान, विद्युत आणि अतिक्रमण विभागाशी संबंधित आहेत. बांधकाम विभागाकडून वेळोवेळी या विभागांना सूचना केल्या गेल्या; परंतु ही कामे अद्याप पूर्ण केली गेली नाही. ठेकेदाराने ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली, अशा ठिकाणी काम पूर्ण केले. उर्वरित काम अपूर्ण असून, पालिकेतील विविध विभागांत समन्वय नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

तोफखाना पोलीस चौकी ते सोनानगरपर्यंतच्या डाव्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उजव्या बाजूचे कामही श्रमिकनगरपर्यंत पूर्ण झालेले आहे. सोनानगर ते श्रमिकनगर या मार्गावरील झाड उद्यान विभागाने अद्याप काढलेले नाही. त्यामळे हे काम थांबले आहे. श्रमिकनगर ते कुष्ठधाम या मार्गावरील दुकानदार काम करण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे या मर्गावरील साईडपट्टीचे काम अपूर्ण राहिलेले आहे. कुष्ठधामपर्यंतच्या रस्त्यावर टपऱ्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा निचरा होणेही आवश्यक आहे. भिस्तबाग चौकापर्यंत उजव्या व डाव्या बाजूचा रस्ता काम करण्यासाठी मोकळा करून मिळावा, अशी मागणी ठेकेदाराकडून पत्राद्वारे पालिकेकडे करण्यात आली आहे.

....

जोड रस्त्यांची समस्या गंभीर

तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल या मार्गावर ७ ते ८ जोड रस्ते येतात. हे सर्व रस्ते मुख्य रस्त्यापासून उंचावर आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे पाणी मुख्य रस्त्यावर येऊन साचणार आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईड गटार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन केल्यास हा रस्ता अधिक काळ टिकेल, अशी सूचनाही ठेकेदाराकडून करण्यात आली आहे.