शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कुष्ठधाम रस्त्याच्या रुंदीकरणाचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST

अहमदनगर : येथील पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणात पत्र्याचे शेड, विद्युत खांब, दुकानांचे पक्के बांधकाम आडवे येत ...

अहमदनगर : येथील पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणात पत्र्याचे शेड, विद्युत खांब, दुकानांचे पक्के बांधकाम आडवे येत आहे. पालिकेतील बांधकाम, पाणी पुरवठा आणि अतिक्रमण विभागांत समन्वय नाही. त्यामुळे हे काम रखडले असून, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

महापालिकेने सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्चून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ए. जी. वाबळे कंस्ट्रक्शन ॲण्ड हेवी मशनरीज कंपनीला १६ जून २०२०पर्यंत मुदत होती. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही, असा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र रुंदीकरणाच्या आड येणारी झाडे, विद्युत खांब, ड्रेनेजलाईन, पाण्याची लाईन आणि दुकानदारांची अतिक्रमणे पूर्णपणे काढण्यात आलेली नाहीत. तसे ठेकेदाराकडून वेळोवेळी रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. ही कामे बांधकाम, पाणी पुरवठा, उद्यान, विद्युत आणि अतिक्रमण विभागाशी संबंधित आहेत. बांधकाम विभागाकडून वेळोवेळी या विभागांना सूचना केल्या गेल्या; परंतु ही कामे अद्याप पूर्ण केली गेली नाही. ठेकेदाराने ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली, अशा ठिकाणी काम पूर्ण केले. उर्वरित काम अपूर्ण असून, पालिकेतील विविध विभागांत समन्वय नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

तोफखाना पोलीस चौकी ते सोनानगरपर्यंतच्या डाव्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उजव्या बाजूचे कामही श्रमिकनगरपर्यंत पूर्ण झालेले आहे. सोनानगर ते श्रमिकनगर या मार्गावरील झाड उद्यान विभागाने अद्याप काढलेले नाही. त्यामळे हे काम थांबले आहे. श्रमिकनगर ते कुष्ठधाम या मार्गावरील दुकानदार काम करण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे या मर्गावरील साईडपट्टीचे काम अपूर्ण राहिलेले आहे. कुष्ठधामपर्यंतच्या रस्त्यावर टपऱ्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा निचरा होणेही आवश्यक आहे. भिस्तबाग चौकापर्यंत उजव्या व डाव्या बाजूचा रस्ता काम करण्यासाठी मोकळा करून मिळावा, अशी मागणी ठेकेदाराकडून पत्राद्वारे पालिकेकडे करण्यात आली आहे.

....

जोड रस्त्यांची समस्या गंभीर

तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल या मार्गावर ७ ते ८ जोड रस्ते येतात. हे सर्व रस्ते मुख्य रस्त्यापासून उंचावर आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे पाणी मुख्य रस्त्यावर येऊन साचणार आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईड गटार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन केल्यास हा रस्ता अधिक काळ टिकेल, अशी सूचनाही ठेकेदाराकडून करण्यात आली आहे.