शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: March 27, 2016 23:41 IST

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़ हा पाणीसाठा पुढील चार महिने पुरेल़ मात्र, जुलैपर्यंत वरुणराजाची कृपा न झाल्यास काय, याची चिंता सध्या सर्वांना लागून आहे़उन्हाचा पारा एकदम वाढला आहे़ सर्वांच्या घशाला कोरड पडली आहे़ पिण्याच्या पाण्याची मागणी मार्च अखेरीस अचानक वाढली़ बहुतांश गावांतील पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे सर्वांची भिस्त जिल्ह्यातील धरणांवर आहे़ मात्र, जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले गेले़ त्यामुळे या दोन्ही धरणांतील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली़मुळात सध्या ७ हजार ७८५ तर भंडारदरा धरणात अवघा १ हजार ८५९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे़ उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे़ उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले़ दोन्ही धरणांतून पिण्यासाठी प्रत्येकी चार आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे़ गावतळे भरून तेथून टँकरने पाणी पुरविले जाणार आहे़ परंतु वाहतुकीचे अंतर वाढणार असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होण्याची शक्यता आहे़ गावांसह वाड्यावस्त्यांवरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे पुढील दोन महिन्यांत टँकरची संख्या वाढणार आहे़ दक्षिण नगर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे़ कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे़ त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटेल़ उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव आणि श्रीरामपुरासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा धारणातून आवर्तन सोडण्यावर एकमत झाले आहे़ (प्रतिनिधी)