शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: March 27, 2016 23:41 IST

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़ हा पाणीसाठा पुढील चार महिने पुरेल़ मात्र, जुलैपर्यंत वरुणराजाची कृपा न झाल्यास काय, याची चिंता सध्या सर्वांना लागून आहे़उन्हाचा पारा एकदम वाढला आहे़ सर्वांच्या घशाला कोरड पडली आहे़ पिण्याच्या पाण्याची मागणी मार्च अखेरीस अचानक वाढली़ बहुतांश गावांतील पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे सर्वांची भिस्त जिल्ह्यातील धरणांवर आहे़ मात्र, जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले गेले़ त्यामुळे या दोन्ही धरणांतील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली़मुळात सध्या ७ हजार ७८५ तर भंडारदरा धरणात अवघा १ हजार ८५९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे़ उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे़ उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले़ दोन्ही धरणांतून पिण्यासाठी प्रत्येकी चार आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे़ गावतळे भरून तेथून टँकरने पाणी पुरविले जाणार आहे़ परंतु वाहतुकीचे अंतर वाढणार असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होण्याची शक्यता आहे़ गावांसह वाड्यावस्त्यांवरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे पुढील दोन महिन्यांत टँकरची संख्या वाढणार आहे़ दक्षिण नगर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे़ कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे़ त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटेल़ उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव आणि श्रीरामपुरासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा धारणातून आवर्तन सोडण्यावर एकमत झाले आहे़ (प्रतिनिधी)