शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: July 7, 2014 00:36 IST

अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा हे नक्षत्र ओळीने कोरडे गेले आहेत. पावसाळ्यातील सुमारे महिनाभराचा कालावधी संपला आहे. रविवार (दि.६) पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे.

अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा हे नक्षत्र ओळीने कोरडे गेले आहेत. पावसाळ्यातील सुमारे महिनाभराचा कालावधी संपला आहे. रविवार (दि.६) पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील धरणात असणारा पाणी साठा दिवसागणीक आटू लागला आहे. यामुळे शेतकरी, प्रशासन आणि राज्य शासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. साडे चार लाख हेक्टर क्षेत्र असणाऱ्या खरीप हंगामासाठी अवघी टक्काभरही पेरणी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपलेली आहे. मात्र, जिल्ह्यात कोठेच दमदार पाऊस झालेला नाही. पाऊस आणखीन लांबल्यास माणसांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा कोठून उपलब्ध करायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरीप हंगामातील कडधान्य पिके पावसाअभावी वाया गेली असून अन्य पिकांची पेरणी होती की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १५६१ स्वतंत्र तर ४३ प्रादेशिक पाणी योजना आहेत. या पाणी योजना धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असून धरणांनी तळ गाठला असल्याने योजना चालणार कशा आणि शहरी भागात पाणी मिळणार कसे हा प्रश्न आहे. जिल्ह्यात गत महिनाभरात अवघा ८ टक्के पाऊस झाला असून नगरशहरात त्याचे प्रमाण थोडे फार आहे. गत वर्षी जुलै महिन्यात २९ टक्के पाऊस झाला होता. यामुळे खरीप हंगामाची स्थिती चांगली होती. यंदा नेमके उलटे चित्र आहे. या दिवसात पावसाच्या आषाढी पाळ्या (सरीवर) बाजरीची वाढ होत असते. पण यंदा स्थिती भयानक आहे. सर्वांना पावसाची आस आहे. (प्रतिनिधी) धरणातील पाणीसाठा (दक्षलक्ष घनफूटमध्ये)मुळा ५ हजार ९, भंडारदरा ६८७, निळवंडे ५०८, आढळा १५७, मांडओहळ १७१.१९, घोड १९७२, सीना २०९, खैरी २९.१५, विसापूर १३, मुसळवाडी ५२.१२, टाकळीभान ११.३४ असे आहे.जिल्ह्यात सध्या ३१७ टँकरव्दारे २८० गावे आणि ११५३ वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा सुरू आहे. या टँकरव्दारे साडेपाच लाख लोकसंख्येची तहान भागविण्यात येत आहे.