शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

वाळू साठ्यांच्या लिलावाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील १५ वाळू घाटांसाठी एक जानेवारीपासून लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, एका घाटाचा लिलाव वगळता या ...

अहमदनगर : जिल्ह्यातील १५ वाळू घाटांसाठी एक जानेवारीपासून लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, एका घाटाचा लिलाव वगळता या प्रक्रियेकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. एकीकडे दोन वर्षांपासून वाळू लिलाव होत नसल्याने वाळू मिळत नसल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे लिलाव प्रक्रिया राबवूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२०२०-२१ या वर्षासाठीच्या ६ जून २०२१ या सहा महिन्यांच्या मुदतीसाठी वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. वाळू घाटांची ई-निविदा प्रक्रिया असून, त्यामध्ये ठेकेदारांनी ई-लिलाव पद्धतीने सहभागी व्हायचे आहे. निविदा दाखल करणे आणि लिलावात सहभागी होणे या दोन्ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्या. वाळू लिलावासाठी १५ घाट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी सोनारी-कोळगावथडी या घाटाचा लिलाव झाला असून, अण्णासाहेब रंगनाथ थोरात (जोर्वे) यांनी या घाटासाठी सर्वाधिक १ कोटी ८६ लाख २७ हजार २५० रुपयांची बोली लावली होती. या घाटासाठी प्रशासनाने १ कोटी ६० लाख १७ हजार २५० रुपयांची हातची किंमत (बोली) जाहीर केली होती.

प्रतिसाद न मिळालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खु.- नायगाव (१ व २), मातुलठान (घाट क्रमांक १, २ आणि ३), कोपरगाव तालुका- कोकमठाण व संवत्सर, जेऊर कुंभारी व जेऊर पाटोदा, राहुरी तालुका- राहुरी खुर्द, पिंप्री वळण, चंडकापूर, वळण, रामपूर, सात्रळ, राहाता तालुका- पुणतांबा, रस्तापूर येथील रेती घाटांसाठी दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया २२ जानेवारी सुरू होणार असून, या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशसनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ का फिरवली? याचे नेमके कारण सांगता येत नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.