शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मातीतून आलेला बबन पाडेकर मातीत विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

आम्ही टक्केवारीच्या भाषेत बोलतो. मृत्यूंची टक्केवारी इतक्या टक्क्यांनी कमी झाली वगैरे वगैरे, पण प्रत्येक मृत्यू हा शंभर टक्के असतो ...

आम्ही टक्केवारीच्या भाषेत बोलतो. मृत्यूंची टक्केवारी इतक्या टक्क्यांनी कमी झाली वगैरे वगैरे, पण प्रत्येक मृत्यू हा शंभर टक्के असतो ना! त्यामुळे जाणारे मातृत्व शंभर टक्के जाते ना! टक्केवारी हे मानवी मनाला गुंगवण्याचे एक औषध वाटते. शेवटी ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हेच खरे आहे.

बहिरवाडीचे पाडेकर गेले. सुबत्ता सतना गेले. ते उद्योजक तर होतेच, पण एक प्रयोगशील शेतकरी होते. ते ग्रामसंस्कृतील ओरिजनल टॅलेंट होतं. जे केलं ते खेड्यात राहून केलं. साधेपणाने राहिले. डोक्यात हवा जाऊ दिली नाही. पायांनी जमीन कधी सोडली नाही.

माझं पाडकरांबाबतचं आकर्षण अलीकडचं. प्रवरा आढळा खोऱ्यांमध्ये बारा गाव पठार! या पठारावर पुन्हा डोंगर. अशाच एका मुथाळमेंच्या डोंगरावर पाडेकरांनी शेती घेतलेली. तेथील त्यांची साठ एकरांवरील पसरलेली फळबाग. शेती, जमिनीपासून दोन हजार फूट उंच. टाइमपास म्हणून तिथे गेलो.

डोंगरमाथ्यावर चौफेर फळझाडं, डाळिंब, चिक्कू, आंबा, मोसंबी, बोर.. अविश्वसनीय! त्यानंतर एका भगीरथाची ढगातील शेती म्हणून वृत्तपत्रात मी लेख लिहिला. होय तो भगीरथच ! पुराण--- भगीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली. याने तरंगणाऱ्या ढगातील गंगा डोंगरमाथ्यावर उतरवली. हाच तो काय फरक ! पुराणातल्या भगीरथाकडे मंत्र-तंत्र तरी होते! याच्याकडे काय होतं ! होता केवळ घाम ! रक्ताचे थेंब ! त्याचे वर्णन शब्दांचे काम नव्हते ! केवळ डोळ्यांनी पहावे असे.

त्या माझ्या लेखाला मोठा पुरस्कार मिळाला, कारण त्यात पर्यावरणाच्या मोठ्या प्रश्नाला एक छोटे उत्तर होते. असा तो प्रयोग आणि एक लेखक-पत्रकार म्हणून पाडेकर हे एक आकर्षक बिंदू ठरले.

मला कायम वाटत आलं. ‘ढगारल्या शेतीला महाराष्ट्रातील कुणी धोरणकर्ते, वरिष्ठ अंमलदार, टॅलेंट यांनी भेट द्यावी, पण तसेही फारसे झाले नाही. भगीरथ प्रयत्न म्हणजे काय याच्या दर्शनासाठी तरुण पिढ्यांनी तिकडे भेट द्यायला हवी, पण झाले असे की, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत जेवढा भास देता येईल तेच नको ते काम केल गेलं. मला ती एक विकृती वाटली, कारण तिथे महाराष्ट्राच्या एका जटिल प्रश्नाला उत्तर देण्याचा एक प्रयोग चालू होता. याचे भान कुणाच्या गावीही नव्हते. ‘आवळावाला’ बबन पाडेकर नावाचं मातीतून उठवलेले एक खरे-खुरे टॅलेंट पुन: काल मातीमग्न झाले आहे.

-शांताराम गजे

-------