शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

शंभर रुपये खर्चात निवडणूक जिंकणारा ‘अवलिया’

By admin | Updated: May 2, 2016 23:31 IST

बाळासाहेब काकडे ल्ल श्रीगोंदा एक बैलगाडी अन् सायकलवर प्रचार करीत अवघ्या शंभर रुपयात आमदारकीची निवडणूक जिंकणाऱ्या अवलिया बाबुराव भारस्कर तथा

रत्नागिरी : पर्ससीन नेटबाबत शासनाने अद्याप निर्णय न दिल्यामुळे मासेमारी बंद आहे. केवळ पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू आहे. पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते. पर्ससीन नेट बंदी अद्याप जारी असल्याने नौका मालकांनी जाळी वाळविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे.दरवर्षी १५ जून ते १५ आॅगस्टपर्यंत मासेमारी बंद करण्यात येते. माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्याने मासेमारी बंद केली जाते. शिवाय पावसाळी वातावरण असल्याने वादळ, वारा यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावल्या जातात. वास्तविक ९० दिवसांचा कालावधी अधिक असल्यामुळे मच्छीमारी संघटनांकडून ९०ऐवजी ६० दिवसांची मासेमारी बंदीची मागणी करण्यात आली आहे. परंतु पर्ससीन बंदी अद्याप जारी आहे. शिवाय पावसाळ्यातील मासेमारी बंदीस महिना शिल्लक राहिला आहे. पर्ससीनबाबत शासनाकडून निर्णय न झाल्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू आहे. पर्ससीनअभावी मत्स्य उत्पादनात घट झाल्याने आर्थिक उलाढाल ठप्प आहे. बाजारात माशांची आवक मंदावली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या नौकेला लागणारे इंधन, बर्फ, खलाशी पगार, शिवाय अन्य खर्चासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणातही मासे मिळत नाहीत. त्यामुळे काही मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. काही मच्छीमार मालकांनी नौका किनाऱ्यावर लावण्यास प्रारंभ केला आहे. जाळ्या वाळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.जाळ्यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात असल्याने समुद्राच्या खाऱ्या पाण्याने जाळी खराब होतात. शिवाय गाळात अडकून जाळी फाटतात. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असल्यामुळे जाळ्या खराब होऊ नयेत, यासाठी ती गोड्या पाण्याने स्वच्छ धुवून वाळवून सुरक्षित ठेवण्यात येतात. शिवाय पावसाळ्यात जाळ्यांची दुरूस्तीदेखील करून घेण्यात येते. मोकळ्या मैदानात, रस्त्याच्या कडेला जाळ्या वाळत घालण्यात येत आहेत. पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्याने येणाऱ्या माशांची फर्माईश होऊ लागली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या माशांची किंमत अव्वाच्या सव्वा सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांकडून मात्र कालवी, मुळे यांना पसंती अधिक दर्शविली जात आहे. (प्रतिनिधी)