शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील गौण खनिजच्या ४५६ प्रकरणात ५० कोटी रुपयांची वसुली तातडीने करावी. रक्कम वसूल होत नसेल तर थकबाकीदारांच्या ...

अहमदनगर : जिल्ह्यातील गौण खनिजच्या ४५६ प्रकरणात ५० कोटी रुपयांची वसुली तातडीने करावी. रक्कम वसूल होत नसेल तर थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करून ही रक्कम वसूल करावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गौण खनिज विभागाला दिला.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तहसील स्तरावरील गौण खनिज थकबाकीदारांची झालेली वसुली व शिल्लक वसुली याबाबतचा आढावा घेण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस विशेष शिबिराचे नगर येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. गौण खनिज प्रकरणात जिल्ह्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच कारवाई झालेली आहे. यादरम्यान पंचनामे झालेले, वाळूची अवैध वाहतूक करताना आढळलेले, अवैध वाळूसाठे जप्त केले आहेत. अशा कारवाईत पंचनामे झालेले असून, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. वाळूची वाहतूक करताना वाहने आढळली, मात्र ती परजिल्ह्यांतील होती. जिल्ह्यात महसूल पथकाना अनधिकृत गौण खजिनचे साठे आढळून आले. यामध्येही काही प्रकरणे आहेत. त्यामध्ये प्राथमिक कारवाई झालेली ४५६ प्रकरणे आहेत. या प्रकरणाची वसूल करायची रक्कम ही ५० कोटींच्या पुढे असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये काही प्रकरणात जमिनीवर बोजा चढविण्यात आला आहे. काही प्रकरणांत मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये जप्त मालमत्तेचे लिलाव करून सदरची रक्कम वसूल करावी, असे आदेश जिल्हाधिकारी भोसले यांनी या शिबिरात दिले.

यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी वासिम सय्यद, आशुतोष खेडकर यांच्यासह गौण खनिज विभाग आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.