शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

दिल्लीतील शेतकऱ्यांवर दडपशाहीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST

श्रीरामपूर : दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप श्रमिक ...

श्रीरामपूर : दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप श्रमिक शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. त्यात हा आरोप करण्यात आला.

आजपर्यंत दिल्लीच्या आंदोलनात दोशनेपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला. १४५ शेतकरी बेपत्ता आहेत. त्याबाबत सरकार दरबारी कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. शेतकऱ्यांप्रती बेदरकारपणे उत्तरे दिली जात आहेत. सरकारी यंत्रणा वापरून हे आंदोलन बदनाम करण्याचा, चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, अशी टीका संघटनेने केली आहे.

शेतकरी आंदोलक कायदा वापसी नही तो घरवापसी नाही या मागणीवर ठाम आहेत. दिवसेंदिवस आंदोलनाचा जोर वाढत आहे. पंतप्रधान स्वत: चर्चेला तयार आहोत असे सांगत असले तरी त्याबाबत कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. हा दडपशाहीचा प्रकार आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे तत्काळ मागे घ्यावेत. केरळ व पंजाब राज्यांच्या सरकारांनी केलेल्या ठरवाप्रमाणे महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारनेही निर्णय घ्यावा. शेतीमालाला आधारभूत किमत देणाऱ्या एमएसपीचा कायदा करावा व तेवढी किंमत न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर शिक्षा व दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील मका, सोयाबीन, कापूस ,कडधान्य या प्रमुख पिकांची हमीभावात खरेदी करणारी केंद्र राज्य सरकारने सुरू करावीत. सध्याच्या बाजार समिती कायद्यामध्ये शेतकऱ्यांना अनुकूल असे बदल करण्यात यावे, सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्त करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉ.राजेंद्र बावके, जीवन सुरूडे, श्रीकृष्ण बडाख, उत्तम माळी, लखन डांगे, अजय बत्तीसे, राहुल दाभाडे,अस्लम शेख, राहुल मेहत्रे आदींच्या सह्या आहेत.

--------