शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

दिल्लीतील शेतकऱ्यांवर दडपशाहीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST

श्रीरामपूर : दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप श्रमिक ...

श्रीरामपूर : दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप श्रमिक शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. त्यात हा आरोप करण्यात आला.

आजपर्यंत दिल्लीच्या आंदोलनात दोशनेपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला. १४५ शेतकरी बेपत्ता आहेत. त्याबाबत सरकार दरबारी कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. शेतकऱ्यांप्रती बेदरकारपणे उत्तरे दिली जात आहेत. सरकारी यंत्रणा वापरून हे आंदोलन बदनाम करण्याचा, चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, अशी टीका संघटनेने केली आहे.

शेतकरी आंदोलक कायदा वापसी नही तो घरवापसी नाही या मागणीवर ठाम आहेत. दिवसेंदिवस आंदोलनाचा जोर वाढत आहे. पंतप्रधान स्वत: चर्चेला तयार आहोत असे सांगत असले तरी त्याबाबत कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. हा दडपशाहीचा प्रकार आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे तत्काळ मागे घ्यावेत. केरळ व पंजाब राज्यांच्या सरकारांनी केलेल्या ठरवाप्रमाणे महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारनेही निर्णय घ्यावा. शेतीमालाला आधारभूत किमत देणाऱ्या एमएसपीचा कायदा करावा व तेवढी किंमत न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर शिक्षा व दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील मका, सोयाबीन, कापूस ,कडधान्य या प्रमुख पिकांची हमीभावात खरेदी करणारी केंद्र राज्य सरकारने सुरू करावीत. सध्याच्या बाजार समिती कायद्यामध्ये शेतकऱ्यांना अनुकूल असे बदल करण्यात यावे, सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्त करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉ.राजेंद्र बावके, जीवन सुरूडे, श्रीकृष्ण बडाख, उत्तम माळी, लखन डांगे, अजय बत्तीसे, राहुल दाभाडे,अस्लम शेख, राहुल मेहत्रे आदींच्या सह्या आहेत.

--------