शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनावरच अण्णा हजारेंची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST

पारनेर (अहमदनगर) : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या सोडविण्याबाबत केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून सहा महिन्यात अहवाल ...

पारनेर (अहमदनगर) : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या सोडविण्याबाबत केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून सहा महिन्यात अहवाल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केले. शुक्रवारी (दि. २९) राळेगणसिद्धी येथे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसह इतर मागण्यांबाबत ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. हजारे यांनी उपोषण स्थगित करावे, यासाठी केंद्र सरकारकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी दुपारी कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते आदींनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली. यावेळी अण्णांच्या विविध मागण्यांबाबत तीन तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

फडणवीस म्हणाले, कोरोनामुळे हजारे यांच्या विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारला कार्यवाही करता आली नाही. आता केंद्र सरकारने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती गठित करण्यासाठी लवकरच दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार असून, या बैठकीला हजारेही उपस्थित राहणार आहेत. या समितीत नीती आयोगाचे सदस्यही असतील. शेतकरी सदस्य निवडीचा अधिकार हजारे यांना देण्यात आला आहे. हजारे हे या समितीचे निमंत्रित सदस्य असतील. याशिवाय समितीच्या होणाऱ्या बैठकांनाही ते उपस्थित राहणार आहेत. समिती शेतकऱ्यांबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करून आपला अहवाल सहा महिन्यात देणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार पुढील कार्यवाही करणार आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी म्हणाले, हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रांवर सकारात्मक कार्यवाही केली आहे. केंद्राने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, फसल विमा योजना अशा योजना सुरू केल्या आहेत.

----

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत अनेकदा पत्र पाठवले. त्यामध्ये वेगवेगळे पंधरा मुद्दे मांडले. मात्र, केंद्राकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता केंद्र सरकारनेच समिती स्थापन करून लवकरच विविध मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करत आहे.

- अण्णा हजारे,

ज्येष्ठ समाजसेवक