शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे रमले शेतीत!

By admin | Updated: July 11, 2016 01:00 IST

विनोद गोळे - पारनेर जगभरात जनलोकपाल व पाणलोट क्षेत्रातील कामामुळे पोहोचलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आपल्या राळेगणसिध्दी गावात शेतीत रमले आहेत.

विनोद गोळे - पारनेरजगभरात जनलोकपाल व पाणलोट क्षेत्रातील कामामुळे पोहोचलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आपल्या राळेगणसिध्दी गावात शेतीत रमले आहेत. शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतातून विषमुक्त भाजीपाला पिकवणे, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची शेती करणे, हा संदेश यातून दिला जाणार आहे. सितारा मिरची, शेवगा, दोडक्यासह अनेक भाजीपाला पिके संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेतात घेण्याचे सुरू केले आहे.राळेगणसिध्दीतून अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशाला पाणलोटाचा मंत्र दिला. तर जनलोकपाल कायद्याच्या आंदोलनामुळे जगभरात अण्णांचा नावलौकीक झाला. सध्या तब्येतीमुळे अण्णांनी देशभरातील दौरे थांबवले आहेत. पण देशात व राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे कामही त्यांच्याकडून सुरू आहे. गावातील संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जमिनीत अण्णा सुमारे अडीच एकरावर शेतीचे उत्पादन घेत आहेत. तसेच पॉलीहाऊस व शेडनेटची उभारणी सुरू असून तेथेही विविध उत्पादने घेतली जाणार आहेत. दोन कोटी लीटरचे शेततळे व शेवग्यात सिमला मिरचीचे आंतरपीकअण्णा हजारे यांनी संत निळोबाराय विद्यालयानजीक सुमारे दोन कोटी लीटर पाणी साठवण असलेले शेततळे उभारले आहे. शेततळ्यात पाणीसाठा करून त्याचे पाणी पिकांना दिले जाणार आहे. अडीच एकराच्या शेतीत शेवगा रोपाची लागवड केली असून त्यात सितारा मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याला प्लास्टीक आच्छादन घातले आहे. तसेच ठिबक सिंंचनाने पाणी व सेंद्रीय औषधे दिली जात आहेत. त्यात गाईचे शेण, गावरान गाईचे गोमूत्र, काळा गुळ, दही व इतर पदार्थांपासून बनवलेले जीवामृत खते या मिरचीला दिली जातात. अण्णांच्या वाहनाचे चालक व स्वयंसेवक संदीप पठारे हे शेतीचे काम पाहत आहेत.अण्णा रोज दिवसातील अभ्यागतांच्या भेटीबरोबरच सकाळी तीन तास व सायंकाळी दोन तास शेतीकडे लक्ष देत आहेत. ठिबक व रोपांसह एकूण एक ते दोन लाख खर्च झाला असून चांगले उत्पादन होऊन चांगला भाव मिळाला तर दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास संदीप पठारे यांनी व्यक्त केला.शेतीत चांगली पिके निघत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण कमी खर्चात सेंद्रीय शेती करून त्याचे उत्पन्न, खर्च याचा ताळेबंद तयार करून ठेवला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेलच पण शासनाने शेतकऱ्यांना काय-काय उपलब्ध करून द्यावे, याचाही अभ्यास यातून होणार आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प होणार आहे.अण्णा हजारे,ज्येष्ठ समाजसेवक