शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

अण्णा हजारे रमले शेतीत!

By admin | Updated: July 11, 2016 01:00 IST

विनोद गोळे - पारनेर जगभरात जनलोकपाल व पाणलोट क्षेत्रातील कामामुळे पोहोचलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आपल्या राळेगणसिध्दी गावात शेतीत रमले आहेत.

विनोद गोळे - पारनेरजगभरात जनलोकपाल व पाणलोट क्षेत्रातील कामामुळे पोहोचलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आपल्या राळेगणसिध्दी गावात शेतीत रमले आहेत. शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतातून विषमुक्त भाजीपाला पिकवणे, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची शेती करणे, हा संदेश यातून दिला जाणार आहे. सितारा मिरची, शेवगा, दोडक्यासह अनेक भाजीपाला पिके संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेतात घेण्याचे सुरू केले आहे.राळेगणसिध्दीतून अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशाला पाणलोटाचा मंत्र दिला. तर जनलोकपाल कायद्याच्या आंदोलनामुळे जगभरात अण्णांचा नावलौकीक झाला. सध्या तब्येतीमुळे अण्णांनी देशभरातील दौरे थांबवले आहेत. पण देशात व राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे कामही त्यांच्याकडून सुरू आहे. गावातील संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जमिनीत अण्णा सुमारे अडीच एकरावर शेतीचे उत्पादन घेत आहेत. तसेच पॉलीहाऊस व शेडनेटची उभारणी सुरू असून तेथेही विविध उत्पादने घेतली जाणार आहेत. दोन कोटी लीटरचे शेततळे व शेवग्यात सिमला मिरचीचे आंतरपीकअण्णा हजारे यांनी संत निळोबाराय विद्यालयानजीक सुमारे दोन कोटी लीटर पाणी साठवण असलेले शेततळे उभारले आहे. शेततळ्यात पाणीसाठा करून त्याचे पाणी पिकांना दिले जाणार आहे. अडीच एकराच्या शेतीत शेवगा रोपाची लागवड केली असून त्यात सितारा मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याला प्लास्टीक आच्छादन घातले आहे. तसेच ठिबक सिंंचनाने पाणी व सेंद्रीय औषधे दिली जात आहेत. त्यात गाईचे शेण, गावरान गाईचे गोमूत्र, काळा गुळ, दही व इतर पदार्थांपासून बनवलेले जीवामृत खते या मिरचीला दिली जातात. अण्णांच्या वाहनाचे चालक व स्वयंसेवक संदीप पठारे हे शेतीचे काम पाहत आहेत.अण्णा रोज दिवसातील अभ्यागतांच्या भेटीबरोबरच सकाळी तीन तास व सायंकाळी दोन तास शेतीकडे लक्ष देत आहेत. ठिबक व रोपांसह एकूण एक ते दोन लाख खर्च झाला असून चांगले उत्पादन होऊन चांगला भाव मिळाला तर दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास संदीप पठारे यांनी व्यक्त केला.शेतीत चांगली पिके निघत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण कमी खर्चात सेंद्रीय शेती करून त्याचे उत्पन्न, खर्च याचा ताळेबंद तयार करून ठेवला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेलच पण शासनाने शेतकऱ्यांना काय-काय उपलब्ध करून द्यावे, याचाही अभ्यास यातून होणार आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प होणार आहे.अण्णा हजारे,ज्येष्ठ समाजसेवक