शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

आठ दिवसात जनावरांच्या छावण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 00:50 IST

अहमदनगर : चाऱ्याची कमतरता पाहता चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आवश्यकतेनुसार कार्यवाही करावी. आठ दिवसात शासन पातळीवरून जनावरांच्या छावण्याना मंजुरी देण्यात येणार आहे.

अहमदनगर : चाऱ्याची कमतरता पाहता चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आवश्यकतेनुसार कार्यवाही करावी. आठ दिवसात शासन पातळीवरून जनावरांच्या छावण्याना मंजुरी देण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण व शहरी असा भेद न करता पाणी नसणाऱ्या वाड्या- वस्त्यांवर मागणीनुसार पाण्याचे टँकर मंजूर करण्यात येतील. गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या आवर्तनाबाबत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची २२ किंवा २३ तारखेला मुंबईत बैठक बोलवण्याचे आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री राम शिंदे बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, खा. दिलीप गांधी, आ. बाळासाहेब थोरात, आ. विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. स्नेहलता कोल्हे, आ. राहुल जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत परिपूर्ण प्रस्ताव मिळाल्यास ४८ तासाच्या आत पाण्याच्या टँकरला मंजुरी देण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत मंजूर पाण्याच्या टँकरच्या खेपा पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाण्याचे उद्भव असणाऱ्या भागात पाण्याचे टँकर भरण्यासाठी टंचाईच्या निधीतून डिझेल जनरेटर खरेदी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात ४०८ गावे दुष्काळग्रस्त जाहीर झालेली आहेत. त्यात वाढ होवून हा आकडा ९५३ वर गेला आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांची घोषणा सरकारकडून होणार आहे. गाळाची वाहतूक करणाऱ्यांना रॉयल्टी माफ करण्यात आलेली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बैठकीत विरोधी पक्ष नेते विखे यांनी मुळा आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडताना औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पाण्यासंदर्भात दोन वेळा उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावर नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी उपलब्ध पाणीसाठ्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र का सादर केले नाही, असा सवाल उपस्थित केला. याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांकडे विचारणा केली असता, ही जबाबदारी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असल्याचे सांगितले. भविष्यात असा प्रकार पुन्हा होवू नये, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)