शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अमर शेख यांना काढायचे होते शाहिरी विद्यापीठ

By सुधीर लंके | Updated: August 29, 2020 15:46 IST

मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना यावे, अशी इच्छा बाळगणा-या लोकशाहीर अमर शेख यांनी राज्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यात जमिनही खरेदी करुन आराखडाही तयार केला होता. पण अपघाती निधनामुळे त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले नाही. त्यांच्या पश्चात सरकारनेही हा प्रकल्प साकारला नाही. 

स्मृतिदिन विशेष 

अहमदनगर : मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना यावे, अशी इच्छा बाळगणा-या लोकशाहीर अमर शेख यांनी राज्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यात जमिनही खरेदी करुन आराखडाही तयार केला होता. पण अपघाती निधनामुळे त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले नाही. त्यांच्या पश्चात सरकारनेही हा प्रकल्प साकारला नाही. 

आपल्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजविणारे अमर शेख हे शाहिरीचा वारसा पुढील पिढीत रुजविण्यासाठी आपल्या हयातीत तरुणांची शिबिरे घेत होते. महाराष्ट्रात हा संतांचा, वीरांचा व शाहिरांचा देश आहे. मनोरंजन व लोकशिक्षणासाठी येथील शाहीर झिजले. येथील शाहिरी कला ही महान असल्यामुळे हा वारसा नवीन पिढीत जाण्यासाठी ‘शाहिरी विद्यापीठ’ काढावे असे त्यांचे स्वप्न होते. 

शाहिरी विद्यापीठ हे राज्याच्या मध्यभागी असावे यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यात ते जागा शोधत होते. नाशिकमध्ये शरणपूर भागात त्यांनी जमिनही खरेदी केली. पण त्यांच्या मनात असलेल्या आराखड्यात ती बसत नव्हती. श्रीरामपूर (जि. नगर) तालुक्यातील खंडाळा परिसरातही जमीन खरेदी केली. पण तेथे पाण्याचा प्रश्न भेडसावला. 

अखेर नगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता. शेवगाव) येथे साडेसोळा एकर जमीन खरेदी केली. शेवगाव तालुक्यातील कॉ. आबासाहेब काकडे यांनी या कल्पनेला उचलून धरले होते. या जागेत विहीर खोदण्यात आली, तसेच व्यवस्थापनासाठी विदर्भातील शाहीर अजानराव पोटे यांनाही शेख यांनी बोलावून घेतले होते. वसतीगृह, नऊ हॉल, शाहिरी शिकविणा-या प्राध्यापकांची निवास व्यवस्था, मोठे सभागृह, वृद्ध शाहिरांसाठी ‘शाहीर नगर’ असा नकाशाही तयार करण्यात आला होता. काही जमिनीत शेतीचे उत्पन्न घ्यायचे व त्यातून विद्यापीठ चालवायचे असे आर्थिक नियोजन होते. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम व प्रवेशाची पात्रता देखील ठरली होती. आचार्य अत्रे, जिल्ह्यातील कम्युनिस्ट नेते कॉ. पी.बी. कडू, कॉ. श्रीराम रानडे हे देखील या प्रकल्पाच्या पाठिशी होते. परंतु २९ आॅगस्ट १९६९ रोजी अमर शेख यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. कॉ. आबासाहेब काकडे यांचे चिरंजीव शिवाजीराव काकडे यांच्याकडे यासंदर्भातील दस्तावेज आजही उपलब्ध असून ‘आबासाहेब आणि मी’ या पुस्तकात हे सर्व संदर्भ त्यांनी नोंदविले आहेत. 

अमर शेख यांनी नगर जिल्ह्यात शाहिरी विद्यापीठ साकारण्यासाठी आराखडा बनविला होता. माझे वडील कॉ. आबासाहेब काकडे हेही या प्रकल्पासोबत होते. दुर्दैवाने हे विद्यापीठ साकारले नाही. या विद्यापीठाचा आराखडा उपलब्ध आहे. हा कल्पक विचार होता. शाहिरी व लोककला जपण्यासाठी अशा विद्यापीठाची गरज आहे. सरकारने असे विद्यापीठ निर्माण करुन अमर शेख यांचे स्वप्न पूर्ण करावे.      - अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, शेवगाव.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर