अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची चिंता वाढली आहे. शनिवारी ३२७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४४१ इतकी झाली आहे. एकाच दिवसात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५० आणि ॲण्टीजेन चाचणीत १८ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (९५), अकोले (५), जामखेड (३), कर्जत (१९), कोपरगाव (१६), नगर ग्रामीण (९), नेवासा (६), पारनेर (२८), पाथर्डी (३), राहाता (५२), संगमनेर (३६), शेवगाव (२२), श्रीगोंदा (८), राहुरी (७), इतर जिल्हा (५), श्रीरामपूर (१३) अशा रुग्णांचा समावेश आहे.
शनिवारी २७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ८४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६५ टक्के इतके झाले आहे. शुक्रवारी एकूण मृतांची संख्या ११५२ इतकी होती. त्यामध्ये शनिवारी दोनची भर पडली असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
-------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ७४,८४२
उपचार सुरू असलेले रुग्ण : १४४१
मृत्यू :११५४
एकूण रुग्णसंख्या : ७७,४३७