शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शेतकरी अन् कामगारांच्या हितासाठी आरोप थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST

कामगारांच्या बोनसवर अपशब्द बोलणाऱ्या शेतकरी नेते दशरथ सावंत व बी. जे. देशमुख या दोन नेत्यांची नावे न घेता निषेध ...

कामगारांच्या बोनसवर अपशब्द बोलणाऱ्या शेतकरी नेते दशरथ सावंत व बी. जे. देशमुख या दोन नेत्यांची नावे न घेता निषेध करण्यात आला.

कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू असताना आर्थिक बाजू चव्हाट्यावर आणली तर ऊस तोडणी कामगार व गळीत हंगाम पूर्वतयारी यावर परिणाम होईल. त्यातून कारखाना बंद पडण्याची शक्यता आहे. कारखान्याचा सध्या राजकीय आखाडा होऊ नये याची दखल कारखान्याविरुद्ध आरोप करणारांनी व सत्ताधारी यांनी घ्यावी आणि कामगारांची रोजीरोटी वाचवावी अशी अपेक्षा साखर कामगार संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी आनंद वायकर यांनी केली.

वेळ पडल्यास कारखाना सुरू करण्यासाठी कामगार डोईवर कर्ज घेतील. पण कारखाना बंद पडू देणार नाही. अगस्तीसाठी कामगारांचा त्याग दृष्टीआड करू नका. चार महिन्यांचे पगार थकले तरी तालुक्याची कामधेनू वाचण्यासाठी कामगार झगडतो आहे. २० टक्के बोनसवर कोणी बोलू नये. कामगारांचा तो हक्क आहे. कारखान्याचे ५० टक्के कामगार ऊस उत्पादक सभासद मालक आहे तरीही कारखान्याच्या खांडीच्या आत कामगार राजकारण येऊ देत नाहीत. कारखाना बंद पाडण्यासाठी कुणी प्रयत्न करू नये अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा साखर कामगार युनियनचे अध्यक्ष शरद नेहे यांनी दिला.

निवडणुकीत जे कोणी सत्तेत येतील त्यांना सहकार्य करू, अशी कामगारांची बाजू धोंडीबा राक्षे, अशोक पापळ, विलास वैद्य, रावसाहेब वाकचौरे, मनोहर घुले, अनिल साबळे, विश्वास ढगे, बाळासाहेब भोर, संपत फोडसे आदींनी मांडली. कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..................

राजीनामे मागे घ्यावेत

संचालक मंडळ डोक्यावर कर्ज काढून कारखाना चालवण्यासाठी तयार आहेत, पण त्यांच्यावर आरोप होत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासक आला की कारखान्याचे वाटोळे झालेच समजा. म्हणून निवडणुकीच्या वेळी जरूर आरोप-प्रत्यारोप व्हावेत, सध्या कारखाना गळीत हंगाम तयारी सुरू असताना आरोपांची टिमकी बंद व्हावी व संचालक मंडळाने राजीनामे मागे घ्यावे, अशी अपेक्षा साखर कामगार महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी कोठवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

फोटो १७अगस्ती