शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

पुन्हा मतविभागणीच निर्णायक!

By admin | Updated: June 10, 2014 00:14 IST

भाऊसाहेब येवले,राहुरी राहुरी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ राहुरी, पाथर्डी व नगर अशा तीन तालुक्यांचा मिळून झालेल्या

भाऊसाहेब येवले,  राहुरीराहुरी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ राहुरी, पाथर्डी व नगर अशा तीन तालुक्यांचा मिळून झालेल्या या मतदारसंघात एकमेकांच्या व्होट बँकेबरोबरच मतविभागणी हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. कधीकाळी काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या राहुरी मतदारसंघावर गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपने वरचष्मा निर्माण केला आहे़ चंद्रशेखर कदम यांनी दोनदा, तर आमदार शिवाजी कर्डिले यांनी येथून एकदा विजयश्री खेचून आणला आहे़ आघाडीच्या जागावाटपात राहुरीची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षा डॉ़ उषाताई तनपुरे यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे़ गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी केलेले शिवाजी गाडे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही़ गाडे यांचा सध्या काँग्रेसच्या गोटात वावर आहे. याशिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनीही अजून पत्ते उघडलेले नाहीत. आजघडीला भाजपतर्फे शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीकडून उषाताई तनपुरे अशी सरळ लढत निश्चित मानली जात आहे़ मागील वेळी कर्डिले यांच्या विजयाला कारणीभूत ठरलेले शिवाजी गाडे यावेळी कोणती भूमिका घेतात, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. सुभाष पाटील यांनी निर्णय घेतला नसला तरी माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या हालचालींवर त्यांची भूमिका अवलंबून राहील़ उषाताई तनपुरे यांचे नाव जाहीर करावे यासाठी कार्यकर्त्यांमधून दबाव वाढत आहे़ प्राजक्त तनपुरे व प्रसाद तनपुरे यांची नावे मागे पडल्याने उषाताई तनपुरे यांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे़आमदार कर्डिले यांना गेल्या निवडणुकीत नगर व पाथर्डी तालुक्यांनीे उचलून धरले. राहुरी तालुक्यातून त्यांना फक्त अकरा हजार मतदानावर समाधान मानावे लागले होते़ गेल्या पाच वर्षात कर्डिले यांनी राहुरी तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले़ शिवाय मोदी लाटेचा फायदा त्यांच्यासाठी गृहित धरला जात आहे. राहुरीतून सरळ लढत झाली तर मात्र उषाताई तनपुरे त्यांना जोरदार टक्कर देतील. मात्र उमेदवारांची संख्या वाढली तर ते आमदार कर्डिले यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे कर्डिलेंच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, असा प्रयत्न सुरू झाला आहे़लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांना ४१ हजारांचे मताधिक्य