शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वळणच्या प्रशासनाने सुरु केले पाईपलाईनचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST

राहुरी तालुक्यातील वळण येथील गावातील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत होता. तसेच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा न होण्यामुळे ग्रामपंचायतीकडे लोकांनी ...

राहुरी तालुक्यातील वळण येथील गावातील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत होता. तसेच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा न होण्यामुळे ग्रामपंचायतीकडे लोकांनी स्वच्छ पाणी व नियमित पाणी मिळावे अशी मागणी केली होती. संबंधित ग्रामपंचायतीकडून दखल न घेतल्यामुळे महिला आणि काही ग्रामस्थ आक्रमक होत आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कानडे फाट्यावरील संतप्त महिला त्याचबरोबर माजी उपसरपंच राजू मकासरे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय आढाव, कारभारी खुळे, विजय आढाव आदींनी ग्रामपंचायतमध्ये दाखल होत निवेदन दिले.

त्यानंतर सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, रवींद्र गोसावी, ग्रामसेवक संतोष राठोड यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेत दूषित पाणीपुरवठा कोठून होतो, याची पाहणी केली. चौदा गाव पाणी योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे कदाचित थोडेफार गढूळ पाणी आले असेल पण आता यापुढे असे होणार नाही, अशी ग्वाही ग्रामसेवक संतोष राठोड यांनी दिली.

..........

कानडे फाटा व गावात इतर काही ठिकाणी अनेक दिवसांपासून नागरिकांच्या पाणीपट्ट्या थकलेल्या आहेत. सरपंचांना सहीचे अधिकार मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक बाबतीत काही प्रमाणात अडचण असल्याने काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी आपल्या हक्काबरोबर कर्तव्य म्हणून आपल्याकडील पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.

-संतोष राठोड, ग्रामसेवक

...............

या ठिकाणी नवीन पाईपलाईन करायचीच होती. त्याच दृष्टीने आठ दिवसांपूर्वीच पाईप ही आणले होते. परंतु विरोधक काही गोष्टींना खतपाणी घालून स्ट॔ंट करत आहेत. आम्हाला देखील लोकांची काळजी आहे. विकास कामात राजकारण न करता सहकार्य करावे.

-एकनाथ खुळे, उपसरपंच

( कालच्या बातमीची इमेज वापरावी)