शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वळणच्या प्रशासनाने सुरु केले पाईपलाईनचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST

राहुरी तालुक्यातील वळण येथील गावातील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत होता. तसेच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा न होण्यामुळे ग्रामपंचायतीकडे लोकांनी ...

राहुरी तालुक्यातील वळण येथील गावातील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत होता. तसेच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा न होण्यामुळे ग्रामपंचायतीकडे लोकांनी स्वच्छ पाणी व नियमित पाणी मिळावे अशी मागणी केली होती. संबंधित ग्रामपंचायतीकडून दखल न घेतल्यामुळे महिला आणि काही ग्रामस्थ आक्रमक होत आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कानडे फाट्यावरील संतप्त महिला त्याचबरोबर माजी उपसरपंच राजू मकासरे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय आढाव, कारभारी खुळे, विजय आढाव आदींनी ग्रामपंचायतमध्ये दाखल होत निवेदन दिले.

त्यानंतर सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, रवींद्र गोसावी, ग्रामसेवक संतोष राठोड यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेत दूषित पाणीपुरवठा कोठून होतो, याची पाहणी केली. चौदा गाव पाणी योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे कदाचित थोडेफार गढूळ पाणी आले असेल पण आता यापुढे असे होणार नाही, अशी ग्वाही ग्रामसेवक संतोष राठोड यांनी दिली.

..........

कानडे फाटा व गावात इतर काही ठिकाणी अनेक दिवसांपासून नागरिकांच्या पाणीपट्ट्या थकलेल्या आहेत. सरपंचांना सहीचे अधिकार मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक बाबतीत काही प्रमाणात अडचण असल्याने काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी आपल्या हक्काबरोबर कर्तव्य म्हणून आपल्याकडील पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.

-संतोष राठोड, ग्रामसेवक

...............

या ठिकाणी नवीन पाईपलाईन करायचीच होती. त्याच दृष्टीने आठ दिवसांपूर्वीच पाईप ही आणले होते. परंतु विरोधक काही गोष्टींना खतपाणी घालून स्ट॔ंट करत आहेत. आम्हाला देखील लोकांची काळजी आहे. विकास कामात राजकारण न करता सहकार्य करावे.

-एकनाथ खुळे, उपसरपंच

( कालच्या बातमीची इमेज वापरावी)