शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बेकायदा शिक्षक भरती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:15 IST

अहमदनगर : राज्यामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवत्ताधारक हजारो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात आहेत. गुणवत्ताधारक प्राधान्यक्रम असलेले शिक्षक भरतीच्या ...

अहमदनगर : राज्यामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवत्ताधारक हजारो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात आहेत. गुणवत्ताधारक प्राधान्यक्रम असलेले शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा परीक्षा पुन्हा घेऊन प्रतीक्षा यादी तयार करावी. बेकायदेशीरपणे शिक्षकांची भरती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन यांनी शासनाकडे केली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा सक्तीची केली. ती परीक्षा उत्तीर्ण असणारेच गुणवत्ता धारक उमेदवाराची प्रतीक्षा यादी करून पारदर्शकपणे त्यांनाच शिक्षकांच्या पदावर सामावून घेणार होते. पण, प्रत्यक्षात मात्र मागच्या झालेल्या टीईटी

परीक्षेमधील उत्तीर्ण झालेल्या अगदी नगण्य युवकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. २०१२पासून संस्थांना शिक्षक भरती करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी पळवाटा काढून बेकायदशीरपणे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून भरती केली. त्यामुळे परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षक भरती ही टीईटी व केंद्रीय पध्दतीने असतानाही ते नियम डावलले आहेत. संपूर्ण खोटे रेकॉर्ड तयार करून, ९वी व १०वीच्या वर्गाला शिकवण्यासाठी जागा भरल्या आहेत.

--

जिल्ह्यात सातशे शिक्षकांची भरती

शासन व संस्था चालकांनी मनमानी पध्दतीने आपल्या मर्जीतील, आर्थिक भ्रष्टाचार करून अहमदनगर जिल्ह्यांमध्ये सुमारे सातशेपेक्षा जादा शिक्षकांच्या जागा भरल्या आहेत. सध्या अजूनही भरती सुरू आहे. परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी संघटित होऊन हा लढा आपल्या हक्क व अधिकारासाठी देणे आवश्यक आहे. बेकायदा शिक्षक भरती केलेल्या शिक्षण संस्था व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात कडक कारवाई होण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.