शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ७ वर्षांचे मानधन!

By admin | Updated: July 16, 2014 00:41 IST

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला नसला तरी परिस्थिती गंभीर आहे. यावर प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असली तरी पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला नसला तरी परिस्थिती गंभीर आहे. यावर प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असली तरी पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे. या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी आदर्श ठरेल असे काम करावे, याची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळतांना आपले योगदान व्हावे, यासाठी २००७ पासून त्यांना मिळालेले मानधन, विविध बैठकांचे भत्ते तांबे यांनी व्याजासह अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्याकडे धनादेशाव्दारे परत केले आहे. जिल्ह्यात यंदाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. साडेतीनशे टँकरव्दारे सहा लाख जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पावसाळा लांबल्यास सर्व सामान्य, शेतकरी यांना मोठ्या संकटाला समोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी सर्व सामान्यांना दिलासा मिळेल, अशा प्रकारे काम करणे आवश्यक आहे. यामुळे तांबे यांनी त्यांना २००७ पासून जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी मिळालेले भत्ते, विविध सभांचे मानधन अशी ७८ हजार रुपयांची रक्कम व्याजासह जिल्हा परिषद अध्यक्ष लंघे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. तांबे यांनी लंघे यांना एक लाख एक रुपयांचा धनादेश दिला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अर्थ व बांधकाम सभापती कै लास वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, बाळासाहेब हराळ, परमवीर पांडुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, धनंजय जाधव, अभिजित लुणिया उपस्थित होते.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. माझ्या एक लाख रुपयांच्या मदतीने परिस्थितीत मोठा बदल होणार नाही, अथवा मदत होणार नाही. मात्र, चांगल्या कामाला कोणीतरी सुरूवात करणे आवश्यक होते. यामुळे मिळालेला भत्ता आणि मानधन पुन्हा जिल्हा परिषदेला व्याजासह परत करत आहे.सत्यजित तांबे, जिल्हा परिषद सदस्य.