शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कांदा बियाणांची पाच कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

पारनेर : गारपिटीमुळे केवळ त्यावेळच्या पिकांचेच नुकसान झाले असे वाटत असले तरी पारनेर तालुक्यातील गारपिटीने शेतकऱ्यांचे निरनिराळ्या मार्गांनी नुकसान झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

पारनेर : गारपिटीमुळे केवळ त्यावेळच्या पिकांचेच नुकसान झाले असे वाटत असले तरी पारनेर तालुक्यातील गारपिटीने शेतकऱ्यांचे निरनिराळ्या मार्गांनी नुकसान झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.गारपिटीमुळे शेतकरीच तयार करीत असलेल्या कांदा बियाणांना फटका बसल्याने खरिपात केवळ कांदा बियाणांवर होणारी सुमारे पाच कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकरीच कांदा बियाणे करीत असल्याने त्यांच्या अर्थकारणाला खीळ बसलीच शिवाय सध्या खरीप कांदा लागवडीसाठी बियाणांचा तुटवडा जाणवत असून वाढत्या भावाने बियाणांची विक्री होत आहे.पारनेर तालुक्याला गेल्या दोन ते तीन महिन्यात तीन ते चार वेळा गारपिटीने झोडपले. जवळा, निघोज, पारनेर, अळकुटी, देवीभोयरे, पाडळी आळेसह कान्हूरपठार, दुर्गम भाग असलेल्या काटाळवेढा, पळसपूर, पोखरी, म्हसोबा झाप यासह तालुक्यातील अनेक भागांना याचा फटका बसला. पहिल्या टप्प्यात फक्त शेतातील कांदा व फळबागांचे नुकसान झाल्याचे म्हणत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. परंतु गारपिटीचे दुष्परिणाम आता खरीप हंगामात दिसू लागले आहेत. याचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. (तालुका प्रतिनिधी)नगरला बियाणे उपलब्धपारनेर तालुक्यात गारपिटीचा कांदा बियाणाला फटका बसला आहे हे वास्तव आहे. पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी अजून बियाणे विक्रीला आणले नाहीत. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला असेल. परंतु नगरहून शेतकऱ्यांनी पाचशे रूपये किलोने बियाणे आणले आहे. तालुक्यात बियाणांचा काळाबाजार होत असल्याच्या लेखी तक्रारी नाहीत. काळाबाजार झाल्यास भरारी पथकामार्फत कारवाई करू.- दिलीप कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी, पारनेर बियाणांचा तुटवडासध्या अजुन पावसाची हजेरी नाही. विहिरी व इतर ठिकाणी पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरू करण्याचे धाडस अजून केले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांनी कांदा बियाणे आणले नाही.जवळा, निघोज भागात मात्र सध्या पाण्याचे प्रमाण असल्याने त्यांनी बियाणे खरेदी सुरुवात केल्यावर त्यांना दोन हजार रूपये किलोने बियाणे विकत घेण्याची वेळ आल्याचे जवळा येथील शेतीतज्ज्ञ रामदास घावटे व करंदीचे माजी सरपंच नामदेव ठाणगे यांनी सांगितले. ुपाच कोटींचा तोटातालुक्यात खरीप कांद्याचे क्षेत्र सुमारे दीड हजार ते सतराशे हेक्टरवर अंदाजित होते. यामध्ये एका हेक्टरला बारा किलो बियाणे लागते. शेतकरीच साठ ते सत्तर टक्के बियाणे घरीच करीत होते त्याचे प्रमाण घटले. तालुक्याला किमान अठरा टन कांदा बियाणे असेल तर मागणी पूर्ण होते. सध्या नगरला कंपन्यांचे बियाणे पाचशे ते सातशे रूपये किलो असा भाव ठरला तर शेतकऱ्यांच्याच घरात येणारे सुमारे तीन ते पाच कोटींचे अर्थकारण ठप्प होऊन शेतकऱ्यांना तोटा झाला आहे.