शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

जिल्ह्यात आढळले ४६५ शाळाबाह्य विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST

राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोधमोहीम ...

राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी वीटभट्टी, रेल्वे स्टेशन, प्रत्येक गावातील गजबजलेल्या वस्त्या, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, बाजारतळ, बांधकाम व्यवसायातील कामगार, तसेच रस्त्यावर राहणारे कुटुंब अशा ठिकाणी भेटी देऊन ६ ते १४ वयोगटातील बालके ज्यांनी अद्याप शाळेत नाव दाखल केले नाही किंवा ज्यांची शाळेतील अनुपस्थिती एक महिन्यापेक्षा जास्त आहे अशा बालकांचा शोध घेतला. नगर जिल्ह्यामध्ये अशी एकूण ४६३ बालके आढळली आहेत. त्यामध्ये १४१ बालके कधीच शाळेत गेले नाहीत, तर ३२२ बालकांची शाळेतील हजेरी अनियमित आहे.

------------

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे किंवा शाळेत दाखल करणे आणि त्याला प्राथमिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. अशा वयोगटातील मुले ज्यांनी अद्याप शाळेत नाव दाखल केले नाही किंवा त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले नाही किंवा एक महिन्यापेक्षा अधिक काळ शाळेत अनुपस्थित आहेत अशा मुलांना शाळाबाह्य बालके संबोधले जाते. शिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी अशा विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवून त्यांना शाळेत दाखल केले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे शाळा बंद असल्याने केवळ या विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना शाळेत पाठवले जाईल.