शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

३५ हजार कर्मचारी शोधताहेत शाळाबाह्य विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST

अहमदनगर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाची गेल्या दहा दिवसांपासून विशेष मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील ...

अहमदनगर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाची गेल्या दहा दिवसांपासून विशेष मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील ३१ हजार शिक्षक व ४ हजार अंगणवाडीसेविका दारोदार भटकंती करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यंदा कोरोनामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

या मोहिमेनुसार शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ३ ते ६ वर्षे वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत, खासगी बालवाडीत जात नाहीत, तसेच ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोध मोहीम १ ते १० मार्च या कालावधीत राबविली जात आहे. या मोहिमेत प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक (प्राथमिक व माध्यमिक) हे प्रगणक म्हणून काम करत आहेत. आपल्या परिसरातील बसस्थानके, वीटभट्ट्या, शेतमजूर, घरकुल मजूर, रेल्वे स्थानक, अस्थायी कुटुंब, कचरा वेचणारी बालके, हॉटेल आदी ठिकाणी काम करणारे बालमजूर आदींसाठी स्वतंत्र प्रगणक नेमलेले आहेत. त्यामुळे एकही बालक सर्वेक्षणातून सुटणार नाही, याबाबत खबरदारी या मोहिमेत घेतली गेली आहे. त्यासाठी जिल्हा, तालुका व गावस्तरावर विविध समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत.

हे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत; परंतु यंदा कोरोनामुळे शहरी भागात अडचणी येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे अशक्य असून, अनेक सोसायटीत या कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यातूनही मार्ग काढत ही मोहीम सुरू आहे.

---------

मोहिमेत सहभागी कर्मचारी

शिक्षक - ३१५००

अंगणवाडीसेविका ४०००

-----------

कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही शोधमोहीम राबविणारे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे मोहिमेला त्वरित स्थगिती देण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

- सुनील गाडगे, राज्य सचिव, शिक्षक भारती संघटना.

--------------

शिक्षक घरी येऊन गेले. त्यात त्यांनी घरात मुले किती? शाळेत कोण कोण जाते? कोरोनामुळे कोणाचे शिक्षण थांबले आहे का? अशी माहिती घेतली.

-पोपट कर्डिले, पालक, वाकडी, ता. राहाता.

---------

कोरोनामुळे मुले शाळाबाह्य किंवा स्थलांतरित झाले का? शालेय मुलांची संख्या, मुलींची संख्या, अशी माहिती शिक्षकांनी घरी येऊन विचारली.

- मिनिनाथ वाबळे, पालक, बनपिंप्री, ता. श्रीगोंदा

-----------समितीची एकदा बैठक

१ ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील समित्यांच्या नियोजन बैठका झालेल्या आहेत. नगर जिल्ह्यात अशी एक एक बैठक झाली आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून मिळाली.

--------------

शाळाबाह्य मुले-मुुलींची शोध मोहीम दरवर्षीच असते; परंतु यंदा कोरोनामुळे बऱ्याच कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे किंवा नवीन कुटुंबे दाखल झाली आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम आहे. १० मार्चपर्यंत ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे.

- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.

--------

फोटो - ०९चिल्ड्रेन डमी