शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

जिल्ह्यात ३०९ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील बाधितांची संख्या सातशेवरून थेट तीनशेपर्यंत कमी झाली. जिल्ह्यात शनिवारी ३०९ कोरोनाबाधित आढळले. नगर शहरातील केवळ ५ ...

अहमदनगर : जिल्ह्यातील बाधितांची संख्या सातशेवरून थेट तीनशेपर्यंत कमी झाली. जिल्ह्यात शनिवारी ३०९ कोरोनाबाधित आढळले. नगर शहरातील केवळ ५ जणांचाच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होऊन ती ३ हजार ४६ वर आली आहे.

उपचार सुरू असलेल्यांपैकी शनिवारी ५७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार ८६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.८७ टक्के इतके आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८० आणि अँटिजन चाचणीत ११५ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (५), राहाता (१४), संगमनेर (१८), श्रीरामपूर (२७), नेवासे (१८), नगर तालुका (८), पाथर्डी (२९), अकोले (१२), कोपरगाव (१३), कर्जत (१२), पारनेर (३७), राहुरी (२१), भिंगार (१), शेवगाव (३८), जामखेड (३०), श्रीगोंदा (२०), इतर जिल्हा (६) येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर ५० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा ५,५८० इतका झाला आहे.

---

बरे झालेली रुग्ण संख्या : २,६६,८६२

उपचार सुरू असलेले रुग्ण : ३,०४६

मृत्यू नोंद : ५,५८०

एकूण रुग्ण : २,७५,४८८