शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

२५ लाखांच्या बक्षिसासाठी घातला गंडा!

By admin | Updated: July 5, 2014 00:33 IST

अहमदनगर : एका मोबाईल कंपनीचे सीम कार्ड अनेक वर्षांपासून वापरत असल्याने तुम्हाला २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचा निरोप येताच एकाच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

अहमदनगर : एका मोबाईल कंपनीचे सीम कार्ड अनेक वर्षांपासून वापरत असल्याने तुम्हाला २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचा निरोप येताच एकाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. समोरचा जसा बोलत राहिला, तसा तो करत गेला आणि शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे गेला. २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविण्यासाठी त्याने ६७ हजार रुपये बँकेत भरले. आणखी पैशांची मागणी होऊ लागल्यावर फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर त्याचे डोळे उघडले. समोरच्यांची पैसे कमविण्याची भन्नाट आयडिया पाहून त्याचे डोकेही संतापले.नगर शहरातील एम.आय.डी.सी. परिसरात शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. झालेला प्रकार ज्यांची फसवणूक झाले ते परप्रांतीय कामगार रामप्रकाश मोर्य (वय २८, रा. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यासमोर) यांनीच ‘लोकमत’ला सांगितला. याबाबत त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे. मात्र या फसवणुकीच्या प्रकाराला आम्ही काहीच करू शकत नाहीत, असे उत्तर त्यांना पोलिसांकडून मिळाले. एका मोबाईलवरून एका व्यक्तीने त्यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याची बातमी दिली. अनेक वर्षांपासून तुम्ही एका कंपनीचे सीमकार्ड वापरत आहात. त्यामध्ये भाग्यवान विजेता म्हणून तुमची निवड झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी समोरच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे बँक आॅफ बडोदामध्ये २२ हजार रुपये भरले. लकी ड्रॉचा पिनकोड लॉक आहे. तो ओपन करण्यासाठी ४५ हजार भरण्यास सांगितले आणि मोर्य यांनी बँक आॅफ महाराष्ट्राच्या एम.आय.डी.सी.मधील शाखेतून सांगितलेल्या खात्यावर पैसे भरले. हे पैसे मिळाल्यानंतर दुपारी झालेल्या संभाषणामध्ये त्यांनी बक्षिसाची फाईल आयकर विभागाकडे सोपविण्यात आली असून त्यांना देण्यासाठी ५५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी झालेला प्रकार बँक अधिकाऱ्यांना सांगितला. यावेळी मोर्य यांचे डोळे उघडले. त्यांनी अनेकवेळा संबंधित मोबाईलवर संपर्क केला, मात्र समोरच्या व्यक्तीचा मोबाईल बंद झाला होता. संबंधित खात्याची चौकशी केली असता खात्यावरील सर्व पैसे काढून घेण्यात आले होते. मोर्य हे उत्तरप्रदेशातून असून एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करतात. सदरचा मोबाईल बिहारमधून आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दिवस कष्ट करून केलेली कमाई एकाच दिवसात गेल्याने त्यांना खूप वाईट वाटले. (प्रतिनिधी)